पुणे : राज्यात शिक्षक भरतीसह प्राध्यापक भरती प्रक्रियाही प्रलंबित आहे. नुकतेच शिक्षक भरतीसाठी उपोषण सुरू झालेले असताना प्राध्यापक भरती करण्याच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी नेट-सेट, पीएचडी धारक संघर्ष समितीने गुरुवारपासून पुण्यातील उच्च शिक्षण विभागाच्या कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन सुरू केले आहे.

राज्यातील विद्यापीठे आणि अनुदानित महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांची १० हजारांहून अधिक पदे रिक्त आहेत. राज्य शासनाने रिक्त जागांच्या ४० टक्के पदे भरण्यास मान्यता दिली आहे. तसेच ग्रंथपाल आणि शारीरिक शिक्षण संचालक पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र प्राध्यापक भरती प्रक्रिया अनेक तांत्रिक कारणांनी रखडली असल्याने राज्यभरातील हजारो पात्रताधारक उमेदवारांमध्ये अस्वस्थता आहे. आतापर्यंत प्राध्यापक भरतीसाठी वारंवार मागण्या करून, आंदोलने करण्यात आली आहेत.

rules for RTE admissions Change, Committee Education Department
आरटीईच्या प्रवेशांसाठीच्या नियमांमध्ये होणार बदल… शिक्षण विभागाकडून समितीची स्थापना
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Navi Mumbai , Science Center ,
नवी मुंबई : शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या विज्ञान केंद्राचे ९० टक्के काम पूर्णत्वास
Artificial Intelligence Might Enable Communication with Animals
‘जंगल मंगल विद्यापीठा’त कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद भरते तेव्हा…
Skill University , Tuljapur, Symbiosis Skills University ,
तुळजापुरात कौशल्य विद्यापीठ होणार, सिम्बायोसिस कौशल्य विद्यापीठ करणार तांत्रिक सहकार्य, राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
JNPA Workshop on Green Port Initiative
जेएनपीएची हरित बंदराकडे वाटचाल; बंदर परिसरातील प्रदूषण कमी करण्यासाठी विविध उपक्रम
inspection campaign, breast cancer , cervical cancer ,
स्तन व गर्भाशयमुख कर्करोग निदानासाठी तपासणी मोहीम राबवा – आरोग्यमंत्री
Villainization or demonization of Pandit Jawaharlal Nehru
पंडित नेहरूंचे राक्षसीकरण!

हेही वाचा – सावधान! पिकांवर कीडनाशकांचा वापर वाढतोय; जाणून घ्या कारणे

हेही वाचा – डॉक्टरांची कमाल! रुग्णाला शुद्धीवर ठेवून गुंतागुंतीची मेंदू शस्त्रक्रिया

या पार्श्वभूमीवर नेट-सेट, पीएचडी धारक संघर्ष समितीकडून पुन्हा सत्याग्रह आंदोलन सुरू करण्यात आले. केंद्र सरकार आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशांनुसार १०० टक्के प्राध्यापक भरती करावी, तासिका तत्व धोरण बंद करून समान काम समान वेतन धोरण लागू करावे, सुरू असलेली प्राध्यापक भरती गतिमान करून वेळेत पूर्ण करावी, विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये कायमस्वरुपी पूर्णवेळ प्राध्यापकांची नियुक्ती करावी, अशा मागण्या संघटनेने केल्या आहेत.

Story img Loader