लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : ऐतिहासिक वारसास्थळे भाडेतत्वावर देण्याच्या शासनाच्या निर्णयाचा खासदार सुप्रिया सुळे यांनी कडक शब्दात समाचार घेतला. इतिहासाचे जतन करण्यासाठी शासनाकडे वेळ आणि पैसा नसावा, यासारखे दुर्दैव नाही, अशा शब्दात खासदार सुळे यांनी सरकारवर टीका केली. वारसास्थळे भाडेतत्वावर देण्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

omar abdullah in trouble over bjp alliance talk
भाजपशी युतीच्या चर्चांमुळे अब्दुल्लांच्या अडचणींमध्ये भर
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Dharavi Redevelopment Project Pvt Ltd ground breaking ceremony of Dharavi redevelopment cancelled Mumbai news
अखेर धारावी पुनर्विकासाचे भूमिपूजन रद्द; स्थानिकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर डीआरपीपीएलची माघार
Thane education officer, suspension,
ठाण्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांना निलंबनाबाबत तूर्त दिलासा नाही, राज्य सरकारला राक्षे यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश
Badlapur sexual assault case,
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण: आरोपीच्या चारित्र्याविषयी माहिती गोळा करण्याचे काम सुरू
badlapur case protest mahavikas aghadi
राजकीय पक्षांना बंद पुकारण्याचा अधिकार आहे का? बदलापूर प्रकरणातील बंदविरोधात न्यायालयाने काय निर्णय दिला?
Ajit Pawar in trouble again due to controversial statement
वादग्रस्त विधानाने अजित पवार पुन्हा अडचणीत
Badlapur sexual assault News
Badlapur sexual assault : “बदलापूर प्रकरणातील आरोपीच्या घरावर जमावाचा हल्ला, तोडफोड आणि..”, शेजाऱ्यांनी काय सांगितलं?

केंद्र सरकारच्या ‘वारसास्थळ दत्तक’ योजनेअंतर्गत पुणे शहरातील शनिवारवाड्यासह, आगाखान पॅलेस, पाताळेश्वर लेणी अशी प्राचीन आणि ऐतिहासिक स्थळे भाडेतत्वावर देण्यात येणार आहेत. यावर खासदार सुळे यांनी केंद्र सरकारवर संताप व्यक्त केला आहे. वारसास्थळे जतन करण्यासाठी सरकारकडे पैसा नसावा, यासारखे दुर्दैव नाही, असेही त्या म्हणाल्या.

आणखी वाचा-स्टेट बँकेचे लाखो कोटींच्या कर्जावर पाणी! बड्या थकबाकीदारांकडून केवळ १२ टक्के वसुली

देशातील प्राचीन व ऐतिहासिक वारसास्थळे खासगी संस्था आणि कंपन्यांच्या ताब्यात देण्यासाठी हा घाट घातला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले गड, किल्ले, तथागत गौतम बुद्ध यांची शिकवण देणारी व जागतिक वारसा असणारी लेणी, मंदिरे, वाडे अशी सर्व वारसा स्थळे या निर्णयामुळे खासगी क्षेत्राला आंदण दिली जाणार आहेत, अशी टीका खासदार सुळे यांनी आपल्या ट्विटमध्ये केली आहे.

सरकारी मालकीचे उद्योग विकूनही सरकारचे मन भरले नाही म्हणून आपली परंपरा आणि इतिहास विकण्याचा हा नवा व्यवसाय सरकारने सुरू केला आहे. ही अतिशय संतापजनक गोष्ट आहे. हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अशी मागणीही खासदार सुळे यांनी केली.