पुणे : ‘ही निवडणूक नागरिकांच्या भविष्याचा निर्णय करणारी आहे. देशाच्या विकास आणि प्रगतीसाठी पैशांची नव्हे तर, प्रामाणिकपणे काम करणाऱ्या नेत्यांची कमतरता आहे. ती दूर करण्यासाठी महायुतीच्या डबल इंजिन सरकारला पुन्हा निवडून द्या,’ असे आवाहन केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी केले.

भारतीय जनता पक्ष महायुतीचे कोथरूडमधील उमेदवार, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारार्थ कर्वे पुतळ्याजवळ झालेल्या सभेत गडकरी बोलत होते. खासदार मेधा कुलकर्णी, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, प्रदेश महामंत्री राजेश पांडे, राष्ट्रवादीचे (अजित पवार) शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्यासह रिपाइं, शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

sant Tukaram maharaj suicide news in marathi
देहूत जगद्गुरू संत तुकोबांच्या वंशजांची आत्महत्या; आत्महत्येपूर्वी लिहिली चिठ्ठी
Police force outside actor Rahul Solapurkars house due to security purpose
सिनेअभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त
devendra fadnavis pimpri chinchwad news in marathi
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस गुरुवारी पहिल्यांदाच बालेकिल्ल्यात
fake ordinance pune news in marathi
पुणे : बनावट अध्यादेश काढून वेतनवाढ मिळवण्याचा प्रयत्न उघड, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल
pimpri youth murder news in marathi
Pune Crime Updates: मद्यपान करण्यासाठी पैसे न दिल्याने पिंपरीत युवकाचा खून, तिघेजण अटकेत
pune sahakar nagar water supply cut
पुणे : शहरातील ‘ या ‘ भागात गुरुवारी पाणी नाही !
pune crime news in marathi
Pune Crime News : बिबवेवाडीत टोळक्याकडून ५० हून अधिक वाहनांची तोडफोड
private hospitals in pune city violating rules
पुण्यातील खासगी रुग्णालयांकडून नियम धाब्यावर! आरोग्य विभागाकडून कारवाईचे पाऊल
pune crime latest news in marathi
पुणे: ग्राहकाकडून भाजी विक्रेत्यावर चाकूने वार, खडकी भाजी मंडईतील घटना

हेही वाचा – दोन कोटींच्या खंडणीसाठी शासकीय ठेकेदाराचा खून; ग्रामीण पोलिसांकडून एकास अटक; मध्य प्रदेशातून दोघे ताब्यात

गडकरी म्हणाले, ‘ज्या गावचा राजा व्यापारी त्या गावची प्रजा भिकारी, अशी एक ग्रामीण म्हण आहे. काँग्रेसच्या सत्ताकाळात त्याचे प्रत्यंतर आले. ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष, सिंचनाच्या सुविधांचा अभाव होता. या देशात पाण्याची नाही, तर पाण्याच्या नियोजनाची कमतरता आहे. भाजप सत्तेत आल्यानंतर नदीजोड प्रकल्पातून थेट समुद्रात जाणारे पाणी रोखण्यात आले. राज्य पाण्याने समृद्ध करण्यात आली. पाण्यावरून राज्याराज्यांत होणारी भांडणे मिटविण्याचा यशस्वी प्रयत्न भाजपने केला.’

‘काँग्रेस राजवटीमध्ये चुकीची आर्थिक धोरणे आणि भ्रष्टाचाराने देशाची वाट लागली. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या योग्य धोरणांमुळे मात्र परिस्थिती बदलली आहे. ऑटोमोबाइल क्षेत्राची उलाढाल २२ लाख कोटींपर्यंत वाढली असून ती जगातील तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. पुढील पाच वर्षांत या क्षेत्रात चीनला मागे टाकून दुसऱ्या क्रमांकावर असेल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. देश सुखी, संपन्न आणि समृद्ध आणि विश्वगुरू झाला पाहिजे ही भाजपची इच्छा आहे. योग्य नीती, योग्य व्यक्ती आणि योग्य पक्ष असेल तर हेच साध्य होणार आहे,’ असे ते म्हणाले.

हेही वाचा – Bhosari Assembly Constituency :मतांसाठी धर्मयुध्द करा; देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

‘पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरासाठी केंद्राने ५४ हजार कोटींची कामे प्रस्तावित केली आहेत. पुण्यातील वाढते प्रदूषण रोखण्याची आवश्यकता असून, येत्या काळात एक लाख कोटींची विकासकामे होतील. देशाची प्रगती आणि विकासाला पैशांची नव्हे तर प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांची कमतरता आहे. राज्यात डबल इंजिनचे सरकार आले तर विकासाचा वेगही दुप्पट होईल,’ असा दावा गडकरी यांनी केला.

Story img Loader