पुणे : शिवराज्याभिषेक लोकोत्सव म्हणून साजरा केला जातो. या सोहळ्यात राज्य सरकारही यावेळी सहभागी होणार आहे. सोहळ्यासाठी राज्य सरकारचे सहकार्य अपेक्षित आहे. मात्र, या पारंपरिक सोहळ्यात कोणताही नाटकीपणा असू नये, अशी अपेक्षा स्वराज संघटनेचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी मंगळवारी येथे व्यक्त केली. शिवराज्याभिषेकासाठी रायगडावर येणाऱ्या कोणत्याही शिवभक्ताला अडविण्यात येऊ नये, अशी मागणीही त्यांनी केली.

हेही वाचा >>> पुणे: रेल्वे मालामाल! महिला तिकीट तपासनीसांकडून कोट्यवधींचे उत्पन्न

ganesh temple in Sangli beautifully decorated for Ganesh Jayanti attracting huge crowd
माघी गणेश जयंतीनिमित्त सांगली गणेश मंदिरात गर्दी
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Spontaneous response to exhibition of Shiva era weapons in Karad
शिवकालीन शस्त्रे पाहताना आबालवृद्ध भारावले, कराडमधील प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
Kumbh stampede 1952
Mahakumbh Stampede: एका हत्तीमुळे कुंभमेळ्यात गेले होते ५०० भाविकांचे प्राण; पंडित जवाहरलाल नेहरुंवर झाले आरोप
Prayagraj Stampede
Mahakumbh Stampede: महाकुंभमध्ये चेंगराचेंगरीनंतर पंतप्रधान मोदींचा तीन वेळा योगी आदित्यनाथांना फोन, नेमकी चर्चा काय झाली?
Udayanraje Bhosale statement On Chhaava Movie release
आक्षेपार्ह बाबी वगळून ‘छावा’ प्रदर्शित करावा : उदयनराजे
Ignoring voter growth led to Assembly elections defeat Vishal Patil admits
मतदार वाढीकडे केलेले दुर्लक्ष विधानसभा निवडणुकीत भोवले; विशाल पाटील यांची कबुली
Akola Amravati and Malegaon are main centers that issue certificates to Bangladeshis alleges Kirit Somaiya
“बांगलादेशींना प्रमाणपत्र देणारे अकोला, अमरावती आणि मालेगाव मुख्य केंद्र,” किरीट सोमय्या यांचा आरोप

शिवराज्याभिषेक सोहळ्यासंदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत छत्रपती संभाजीराजे बोलत होते. स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी धनंजय जाधव, चंदुकाका सराफ ॲण्ड सन्स प्रा. लि. कंपनीचे संचालक सिद्धार्थ शहा, मालोजीराजे जगदाळे, निखिल काची यावेळी उपस्थित होते.

छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या माध्यमातून येत्या सहा जून रोजी सोहळा साजरा केला जाणार आहे. त्यामध्ये तिथी किंवा तारखेचा वाद नाही. या सोहळ्याला यंदा ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. सोहळ्यात सेवा करण्यासाठी आणि त्यातील मान मिळविण्यासाठी अनेक जण पुढे येत आहेत. त्यामुळे या लोकोत्सवासाठी कुणालाही निमंत्रण दिले जाणार नाही. शिवभक्तांच्या साक्षीने सोहळा पार पडतो. यासाठी सरकारचे सहकार्यही अपेक्षित आहे. मात्र, त्यात नाटकीपणा असू नये. रायगडावर सन २०१८ मध्ये गर्दी आणि कोंडी झाली होती. रायगडावर येणाऱ्या कोणत्याही शिवभक्ताला पोलिसांनी अडविण्याचा प्रयत्न करू नये. शिवभक्तांची कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये, याबाबतची सर्व खबरदारी घेण्यात आली आहे, असे छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितले.

Story img Loader