पुणे : राज्यात मोसमी पाऊस सक्रिय होण्यास फारशी पोषक स्थिती नाही. त्यामुळे पुढील सहा दिवस म्हणजे १७ ऑगस्टपर्यंत राज्यभरात पावसाची शक्यता कमी आहे, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे, तर १९ ऑगस्टपासून पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे.

अरबी समुद्र, बंगालच्या उपसागरात सामान्य स्थिती आहे. त्यामुळे राज्यात मोसमी पाऊस पडण्यास पोषक स्थितीचा अभाव आहे. १७ ऑगस्टपर्यंत राज्यात पावसाचा जोर कमी असणार आहे. या काळात कोकणात काही ठिकाणी हलका आणि विदर्भात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो. राज्यात सर्वदूर मोसमी पाऊस या काळात उघडीप देईल, अशी माहिती हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिली.

800 cases of dengue and 600 cases of winter fever were found in the state of Maharashtra in 10 days Mumbai print news
राज्यात १० दिवसांत आढळले डेंग्यूचे ८००, तर हिवतापाचे ६०० रुग्ण
IND vs PAK Abhishek Sharma and Pakistani Bowler Fights Indian Batter Gives Death Stare After Fiery Send Off Watch Video
IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामन्यात राडा, पाकिस्तानी गोलंदाजाने…
Weather experts predict the possibility of return of rain across the state pune news
बुधवारपासून राज्यभरात परतीचा पाऊस ? जाणून घ्या, हवामान तज्ज्ञांचा अंदाज
chikungunya cases surge three times more in maharashtra
विश्लेषण : राज्यात यंदा चिकुनगुनियाचे रुग्ण तिपटीने का वाढले?
imd predict after above average rainfall severe cold weather in maharashtra
जास्त पावसानंतर यंदा राज्यात थंडीचाही कडाका
rain Maharashtra, monsoon Maharashtra,
यंदाच्या पावसाळ्यात राज्यात किती पाऊस पडला ? जाणून घ्या, सर्वात कमी, सर्वात जास्त पाऊस कुठे झाला
cyclonic condition in Chhattisgarh will bring heavy rainfall to North Madhya Maharashtra for two days
राज्यात आणखी दोन दिवस मुसळधार पाऊस जाणून घ्या, परतीचा पाऊस कधी सुरू होतो
Heavy rain Maharashtra, rain Maharashtra news,
आजपासून चार दिवस मूसळधार पावसाचे

हेही वाचा – आज मध्यरात्री आकाशात उल्का वर्षाचा प्रकाश उत्सव, खगोलप्रेमींसाठी पर्वणी

हेही वाचा – वर्धा : ‘त्या’ महिलेने पैसा व पदासाठी सतत ब्लॅकमेल केले, हिंदी विद्यापीठाचे कुलगुरू शुक्ल यांचा आरोप

अरबी समुद्रातून येणाऱ्या पश्चिमी बाष्पयुक्त वाऱ्यांचा वेग वाढून १८ किंवा १९ ऑगस्टपासून किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. साधारण २५ ऑगस्टपासून राज्यात बहुतेक भागात हलका पाऊस सुरू होऊन सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस होण्याची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे.