पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेश प्रक्रियेत जवळपास तीस हजार जागा रिक्त राहिल्या आहेत. आता निवड यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठ पुन्हा मुदतवाढ दिली जाणार नसून, प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.

प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यंदा राज्यातील ८ हजार ८२३ शाळांतील १ लाख १ हजार ८४६ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी एकूण ३ लाख ६३ हजार ४१३ अर्ज दाखल झाले. प्रवेशासाठीच्या सोडतीतून ९४ हजार ७०० विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आला. १३ एप्रिलपासून प्रवेश प्रक्रिया सुरू केल्यानंतर तीनवेळा मुदतवाढ देण्यात आली. त्यानुसार प्रवेशासाठीची मुदत सोमवारी (२२ मे) संपली. या मुदतीत सुमारे ६४ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला. त्यामुळे ३० हजार जागा रिक्त राहिल्याचे आरटीई संकेतस्थळावरील आकडेवारीवरून दिसून येते.

Pharmacy, management courses hit , Pharmacy,
प्रवेश प्रक्रियेला विलंब झाल्याने औषधनिर्माणशास्त्र, व्यवस्थापन अभ्यासक्रमांना फटका
22nd October Rashi Bhavishya In Marathi
२२ ऑक्टोबर पंचांग: जन्मराशीनुसार आज कर्तुत्वाला मिळेल चांगला…
Nagpur High Court , academic loss, student,
विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी न्यायालयाने नियमांपलिकडे…
11th Admission, seats vacant, Mumbai, loksatta news,
अकरावी प्रवेश : दैनंदिन गुणवत्ता फेरीअंती जवळपास १ लाख ३४ हजार जागा रिक्त, द्विलक्षी विषयासाठी ७ ऑक्टोबरपर्यंत प्रवेश
CET, new colleges in third round, CET news,
तिसऱ्या फेरीत नव्या महाविद्यालयांतील जागांचा समावेश ? सीईटी कक्षाचे संकेत; दुसऱ्या फेरीला ६ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
girls admission vocational courses, girls Maharashtra admission,
राज्यातील १ लाख ३९ हजार मुलींनी घेतला व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश, ‘या’ अभ्यासक्रमांना सर्वाधिक पसंती
no decision from maha government on mahajyoti withdraw from uniform policy process
‘समान धोरण’मुळे लाखो विद्यार्थी वंचित; ‘महाज्योती’ बाहेर पडल्यानंतर सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा
Non-Creamy Layer, income proof OBC, OBC,
ओबीसींसाठी उत्पन्नाच्या दाखल्याची अट रद्द, शासन निर्णय काय सांगतो?

हेही वाचा >>>अबब! देशातील अतिश्रीमंतांची संख्या पाच वर्षांत ‘एवढी’ वाढणार

प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी म्हणाले, की आता आरटीई प्रवेशांना मुदतवाढ दिली जाणार नाही. निवड यादीतील विद्यार्थ्यांनी घेतलेले प्रवेश, रिक्त राहिलेल्या जागा यांचा आढावा घेऊन तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यास चार दिवस लागतील. त्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. त्याबाबतच्या सूचना स्वतंत्रपणे दिल्या जातील.