परभणीतील मूक मोर्चादरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केले. या विधानाच्या निषेधार्थ राज्यभरात ओबीसी समाजाकडून ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. तसेच, मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीही आंदोलकांकडून करण्यात येत आहे. त्याचदरम्यान काल परळी शहर पोलीस ठाण्यात मनोज जरांगे पाटील यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा >>> पुणे : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार वडिलांसह दोन शाळकरी मुलांचा मृत्यू; चालकाने मद्यप्राशन केल्याचा संशय

residents allege conspiracy to hinder adarsh nagar colony rehabilitation project in worli mumbai
खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी मोकाट; पुनर्वसन प्रकल्प बंद पाडण्याचे षडयंत्र, रहिवाशांचा आरोप
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Youth beaten up for watching news against Valmik Karad and Dhananjay Munde two accused arrested from Karnataka
“कराड, मुंडेंविरोधातील बातम्या का पाहतो”; तरुणाला मारहाण करणारे दोघे आरोपी कर्नाटकातून ताब्यात
lavasa loksatta news,
लवासा प्रकरण : सीबीआय चौकशीची मागणी कशाच्या आधारे ? उच्च न्यायालयाची याचिकाकर्त्यांना विचारणा
Maharahstra Kesari
Maharahstra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा गोंधळ, पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारल्याचा आरोप, नेमकं काय घडलं?
Ramdas Kadam On NCP Ajit Pawar Group
Ramdas Kadam : राष्ट्रवादी-शिंदे गटात वादाची ठिणगी? रामदास कदमांचा मोठा आरोप; म्हणाले, “राष्ट्रवादीच्या ९० टक्के कार्यकर्त्यांनी…”
devendra bhuyar marathi news
अजित पवारांच्या पक्षाचा माजी आमदार म्हणतो, “अर्थसंकल्प भ्रमनिराश करणारा!”
Chhatrapati sambhajinagar loksatta news
सिल्लोड भाजप शहराध्यक्षांसह तिघांविरुद्धचा गुन्हा रद्द, माजीमंत्री अब्दुल सत्तारांविरुद्धचे वक्तव्य प्रकरण

या सर्व घडामोडींदरम्यान आज पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याबाहेर मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी ओबीसी समाजाचे नेते बाळासाहेब सानप, मंगेश ससाणे यांनी कार्यकर्त्यांसह ठिय्या आंदोलन केले. यावेळी बाळासाहेब सानप म्हणाले की, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा राज्यातील ओबीसी समाज निषेध व्यक्त करीत आहे. या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. पण, काही दिवसांपासून राज्यभरात मोर्चे काढून, एका समाजाला लक्ष्य केले जात आहे. हे योग्य नसून, दोन दिवसांपूर्वी परभणी येथील मोर्चादरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी घरात घुसण्याची भाषा वापरली आहे. त्यामुळे तुम्ही कोणाच्या घरात घुसणार आहात आणि घरात घुसून काय करणार आहात, याबाबत उत्तर द्या. तुमच्या या विधानामुळे महाराष्ट्र पेटला आहे. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एकच विनंती आहे की, आपल्या राज्यात कोणी जर अशा प्रकारचे विधान करीत असेल आणि राज्यात हिंसाचार घडवू पाहत असेल, तर अशा व्यक्तीवर बंधन आणले पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

Story img Loader