पुणे : मागील काही महिन्यांपासून महिला, लहान मुलीवर अत्याचाराच्या घटना घडत आहे. या अन्याय अत्याचाराच्या घटनांविरोधात राज्यभरात विविध संघटनांमार्फत आंदोलन करण्यात येत आहे. आज पुण्यातील गुडलक चौकात शरद पवार गटाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली ‘वध तीनतोंडी रावणाचा, लढा स्त्री सन्मानाचा’ या आशयाचे मजकूर असलेले फलक हाती घेऊन महिला आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. हे फलक मेणबत्तीने पेटवून महिलांवरील अत्याचाराविरोधात निषेध नोंदवण्यात आला.

हेही वाचा – ‘तटस्थ’ मनसे आणि पुणेकरही!

A 15 year old girl was raped by her aunt husband in Ghatkopar Mumbai news
समुपदेशनामुळे मुलीवर झालेला अत्याचार उघडकीस; मावशीच्या पतीविरोधात गुन्हा दाखल
Sharad pawar on ladki bahin scheme
मविआ सत्तेत आल्यावर लाडकी बहीण योजना बंद करणार?…
A five year old boy was molested by minors Pune print news
पाच वर्षांच्या मुलावर अल्पवयीनांकडून अत्याचार
Dr Neelam Gorhe suggestion regarding against women oppression Pune news
महिला अत्याचाराच्या विरोधात सर्व घटकांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज- डाॅ. नीलम गोऱ्हे यांची सूचना
case against father, father abusing daughter,
मुंबई : पाच वर्षांपासून मुलीवर अत्याचार करणाऱ्या पित्याविरोधात गुन्हा
High Court comment on Badlapur sexual assault case accused Akshay Shinde encounter Mumbai
हे एन्काउंटर नव्हे! उच्च न्यायालयाची टिप्पणी; थेट डोक्यात गोळी झाडण्याच्या कृतीवरही बोट
akshay shinde s father in high court
बदलापूर लैंगिक अत्याचाराचे प्रकरण : पुरावे नष्ट करण्याची भीती व्यक्त करून अक्षय शिंदेच्या वडिलांची उच्च न्यायालयात धाव
mcoca action against NK gang leader and accomplices in Yerwada
येरवड्यातील एन.के. गँगच्या म्होरक्यासह साथीदारांवर मोक्का कारवाई

हेही वाचा – जेवणात मिरचीचा खर्डा न केल्याने महिलेवर चाकूने वार, येरवडा पोलिसांकडून पतीविरुद्ध गुन्हा दाखल

फलकावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फोटो होते. राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी करीत हे फलक मेणबत्तीने पेटवून निषेध नोंदविण्यात आला. यावेळी प्रशांत जगताप म्हणाले की, राज्यातील अनेक भागांत दररोज प्रत्येक क्षणाला महिला, लहान मुलीवर अन्याय अत्याचाराच्या घटना घडत आहेत. तसेच शाळा, महाविद्यालय परिसरात रोडरोमिओकडून मुलींना त्रास देण्याच्या घटना घडत आहेत. या सर्व घटना लक्षात घेतल्यावर राज्यातील महिला, मुली सुरक्षित नाही आणि दुसर्‍या बाजूला राज्यातील मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री दौरे, बैठका घेत आहेत. या सरकारला कोणाचेही काही देणेघेणे नाही. हे असंवेदनशील सरकार आहे. त्यामुळे हे सरकार राज्यपालांनी बरखास्त करावे, तसेच अन्याय अत्याचार करणार्‍या नराधमांना तातडीने शिक्षा करावी, अशी आमची मागणी असल्याचे ते म्हणाले.