पुणे : कौटुंबिक वाद अथवा शहराचे आकर्षण यामुळे अनेक मुले घर सोडून पळून जातात. ही मुले ही रेल्वेगाड्यांत अथवा स्थानकांवर आश्रय घेतात. अशा एक हजारहून अधिक मुलांची पुन्हा त्यांच्या कुटुंबीयांशी भेट घडविण्याची कामगिरी रेल्वे सुरक्षा दलाने वर्षभरात केली आहे. त्यात पुणे विभागाने २१० मुलांना त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपविले आहे.

रेल्वे सुरक्षा दलाने ‘नन्हे फरिश्ते’ मोहिमेंतर्गत एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत मध्य रेल्वेवरील स्थानकांतून लोहमार्ग पोलीस आणि इतर रेल्वे कर्मचारी यांच्या समन्वयाने १ हजार ६४ मुलांची सुटका केली. स्थानकावर अथवा गाड्यांमध्ये फिरणाऱ्या अशा मुलांना जवानांनी शोधले. त्यांच्याशी संवाद साधून जवान त्यांना बोलते केले. त्यानंतर त्या मुलांनी घर सोडल्याचे सांगितले. चाइल्डलाइनसारख्या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने या मुलांची पालकांशी पुन्हा भेट घडवण्यात आली.

2 killed as auto overturn in khed taluka
मरकळ येथे रिक्षा उलटून दोघांचा मृत्यू
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Hundreds of minor boys and girls commit suicide due to exams stress and love affairs
अल्पवयीन मुला-मुलींच्या शेकडो आत्महत्या, परीक्षा, तणाव, प्रेमसंबंध अन्…
Satara , Mother, conspired, boyfriend, murder,
सातारा : आईने प्रियकरासोबत मुलाच्या हत्येचा रचलेला कट उधळला
pune mns Office bearers and activists became Active during elections time
पुण्यात ‘मनसे’ला मराठी माणसाची पुन्हा आठवण
Arvi , Shivaji Primary School, Padma Chaudhary,
अशीही एक ‘मॅडम’ ! घर समजून शाळेचं रुपडंच बदलले
Gangasagar, who is now a 65-year-old ‘Aghori’ known as Baba Rajkumar
आश्चर्यच! २७ वर्षांपूर्वी घर सोडून गेलेला व्यक्ती महाकुंभमेळ्यात भेटला, पण…; कुटुंबाने केली डीएनए चाचणीची मागणी!
Government school Number of students who have increased during the Corona period returns to their original positions Mumbai news
सरकारी शाळा पुन्हा ओस; करोनाकाळात वाढलेली पटसंख्या मूळ पदावर

आणखी वाचा-खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराला अजित पवार आले, पार्थ पवार येणार?

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने सर्वाधिक ३१२ मुलांची सुटका केली. त्याखालोखाल मुंबई विभागाने ३१२ मुलांची सुटका केली. पुणे विभागाने २१० मुलांची सुटका केली असून, नागपूर विभागाने १५४ आणि सोलापूर विभागाने ७५ मुलांची सुटका केली आहे, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.

Story img Loader