पुणे : भाजपाच्या नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या शिवशक्ती परिक्रमा यात्रेला ठिकठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत आहे. पंकजा मुंडे या पुणे दौर्‍यावर आल्या होत्या. त्यावेळी त्यांना जालना येथे मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी नागरिक आठ दिवसांपासून बसून आहेत, पण अद्यापपर्यत राज्य सरकारकडून ठोस पावले उचलली जात नाहीत, असे विचारण्यात आले. त्यावर, घटना अत्यंत दुर्दैवी असून तिची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी पंकजा यांनी केली.

पंकजा मुंडे म्हणाल्या की, जालन्यातील घटनेची सखोल आणि निःपक्षपाती चौकशी झाली पाहिजे. आता नुसती आश्वासने नकोत, तर पोटातून भावना करून एखाद्याने नेतृत्त्व स्वीकारले पाहिजे. तसेच मराठा समाजाला आरक्षण कसे आणि किती मिळणार हे ठोक ताळे सांगणारा आश्वासित असा चेहरा समोर आला पाहिजे, अशी भूमिका मांडत पंकजा मुंडे यांनी भाजपाला घरचा आहेर दिला आहे.

Amit Shah Mumbai, Amit shah news,
Amit Shah Mumbai : महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर नको! अमित शहा यांची सूचना; पक्षाच्या निवडणूक तयारीचा आढावा
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
gujrat bjp corporator allegation of misbehave
Gujarat : भाजपाच्या नगरसेविकाचा पक्षातील नेत्यावरच गंभीर आरोप; म्हणाल्या, “त्यांनी माझा हात पकडला अन् व्यासपीठावरून…”
Jarange agitation, Mahavikas Aghadi,
जरांगे यांचे आंदोलन महाविकास आघाडीच्या फायद्यासाठी – राजेंद्र राऊत
Pune Rural Superintendent, Sandeep Singh Gill,
ग्रामीण अधीक्षकपदी संदीपसिंग गिल; पंकज देशमुख यांची बृहन्मुंबई येथे उपायुक्त म्हणून नियुक्ती
construction houses mangroves, state government,
खारफुटीवर घरे बांधल्याच्या तक्रारीच्या तपासणीचे राज्य सरकारला आदेश
Rajendra Gavit, Palghar Assembly Constituency,
राजेंद्र गावित पालघरसाठी आग्रही
Yavatmal, Badlapur incident, Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis, women's safety, Shakti Act, severe punishment, public sentiment, Maharashtra politics
बदलापूर घटनेवर अजित पवारांची तिखट प्रतिक्रिया…म्हणाले, तो जो आरोपी आहे त्याचे….

हेही वाचा – पिंपरीतील बीआरटी मार्गातून वाहन चालविल्यास ५०० रुपये दंड…पुन्हा चूक केल्यास भरा १५०० रुपये

हेही वाचा – देहूरोडमध्ये श्वानांचा छळ; दोघांविरोधात गुन्हा

देशातील विरोधकांच्या इंडिया आघाडीमुळे सत्ताधारी केंद्र सरकारकडून सर्व ठिकाणी भारत करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. त्यावरून अनेक आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळत आहे. त्या प्रश्नावर पंकजा मुंडे म्हणाल्या की, तुम्ही इंडियात राहता की भारतात? आपलं नाव भारत आहे आणि इंडिया हे झाले आहे. बॉम्बेच मुंबई होऊ शकते, तर इंडिया भारत ही एक चर्चा असून त्यावर काही तरी निर्णय होईल. तसेच आपण दोन्हीमध्ये राहत नसून त्या काळात कॉलनियन लोकांनी दिलेल नाव आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली.