पुणे : राज्यातील विविध शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन परिवर्तन आघाडी स्थापन केली आहे. विधानसभेच्या आगामी निवडणुकीत सर्व २८८ जागा लढवण्याचा निर्धार या आघाडीने गुरुवारी पुण्यातील बैठकीत केला. नवीन शासकीय विश्रामगृहात परिवर्तन आघाडीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यातील विविध शेतकरी प्रश्नांसह आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटना, तसेच काही पक्षांसोबत परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून लढा उभारण्याचा निर्णय राज्यातील शेतकरी चळवळीतील मुख्य प्रवाहातील शेतकरी संघटनांकडून या वेळी घेण्यात आला. या बैठकीस माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार वामनराव चटप, माजी आमदार शंकर धोंडगे, अनिल घनवट, ललित बहाळ, डॉ. महावीर अक्कोळे, ॲड. योगेश पांडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा