पुणे: उत्तरेतील राज्यांतील धुक्यामुळे सलग चौथ्या दिवशी बुधवारी पुणे विमानतळावरील विमानसेवेला फटका बसला. पुणे विमानतळावरून जाणारे एक आणि येणारी दोन विमाने रद्द करण्यात आली. मागील काही दिवसांपेक्षा विमान रद्द होण्याचे प्रमाण कमी असले, तरी विमानतळावरील सेवेतील गोंधळामुळे प्रवाशांना गैरसोईचा सामना करावा लागला.

हेही वाचा >>> खाद्यतेल वर्षभर स्वस्त; आयातीला मार्च २०२५ पर्यंत मुदतवाढ

dividers closed Shilphata road Students parents trouble
शिळफाटा रस्त्यावरील दुभाजक बंद केल्याने विद्यार्थी, पालकांना फेरफटका
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Metro Line 8 to Link Mumbai and Navi Mumbai Airports
मुंबई विमानतळ ते थेट नवी मुंबई विमानतळ…कशी असेल मेट्रो – ८? खासगी- सार्वजनिक उभारणीचे कोणते फायदे?
MSRTC on hike in bus fares review in marathi
विश्लेषण : एस.टी. भाडेवाढ अपरिहार्य होती का?
Commissioner orders surgical strike on encroachments to break traffic jam
कोंडी फोडण्यासाठी आयुक्त रस्त्यावर, अतिक्रमणांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’चे आदेश
Mahakumbh, Airline companies , fares ,
‘महाकुंभ’साठीच्या दर ‘भरारी’चे नियंत्रण करण्याची मागणी, विमान कंपन्यांच्या भाडेवाढीविरुद्ध ग्राहक पंचायत आक्रमक
shani snan mahakumbh ticket price hike
विदेश दौऱ्यापेक्षा प्रयागराजचा विमान प्रवास महागला, तिकीटे ५०,००० पार; कारण काय? सरकार काय करणार?
thane accidental death Social activist Pushpa Agashe CCTV cameras teen hath naka
आगाशे यांच्या अपघाती निधनानंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा प्रश्न ऐरणीवर

विमानसेवेला उत्तरेतील धुक्याचा बसणारा फटका काही प्रमाणात आता कमी झाला आहे. त्यामुळे पुणे विमानतळावरील तीन विमाने रद्द करण्यात आली. त्यात पुणे ते गुवाहाटी, गुवाहाटी ते पुणे, वाराणसी ते पुणे या तीन विमानांचा समावेश आहे. देशात उत्तरेत धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्याने रविवारपासून विमाने रद्द होण्याचे प्रमाण वाढले होते. अनेक विमानांना पाच ते सहा तासांहून अधिक विलंब होत होता. खराब हवामानाचा विमानसेवेला बसणारा फटका आता कमी झाला आहे. विमाने रद्द होण्याचे प्रमाण कमी झाले असले, तरी विमानतळावरील नियोजनाचा फटका प्रवाशांना बुधवारी बसला. अनेक प्रवाशांनी याबाबत समाजमाध्यमांवर तक्रारी केल्या आहेत. विमानतळावर चेक इन करण्यासाठी एक तासाहून अधिक काळ रांगेत थांबावे लागल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे. विमान कंपन्यांच्या सेवेवरही अनेक प्रवाशांनी ताशेरे ओढले आहेत. विमान कंपन्या आणि विमानतळावरील सेवेच्या गोंधळामुळे प्रवाशांना मनस्ताप झाला. डिजियात्राचा वापर प्रवाशांसाठी ऐच्छिक असतानाही प्रवाशांना त्याची सक्ती केली जात असल्याचा अनुभव अनेक जणांनी मांडला आहे.

Story img Loader