भाजप-शिवसेनेची तुटलेली युती, राष्ट्रवादीची न थांबलेली गळती, शिवसेनेतील अंतर्गत धुसफुस, वाढलेल्या गर्दीमुळे भाजपमध्ये निर्माण झालेले गोंधळाचे वातावरण, दोन्ही काँग्रेसच्या आघाडीतील बिघाडी, मनसे, एमआयएम, रिपाइं असे सारेच निवडणुकांच्या आखाडय़ात शड्डू ठोकून उतरले आहेत. राजकीय पक्षांच्या उमेदवारीचे घोळ सुरू असल्याने अद्याप उमेदवारांची नावे गुलदस्त्यात आहेत. फाजील आत्मविश्वास असल्यामुळे राजकीय पक्षांमध्ये ‘स्व’बळाची खुमखुमी आहे. ‘मतदार राजा’ हुशार आहे. बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीत राजकीय पक्ष न पाहता उमेदवाराची कुंडली पाहूनच कौल दिल्याचा पूर्वीचा इतिहास आहे. त्यामुळे कोणाची लॉटरी लागेल, याची खात्री नाही. एखाद्याच पक्षाची निर्विवाद सत्ता येईल की त्रिशंकू अवस्थेला सामोरे जावे लागेल, असेही सांगता येणार नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा