महापालिका निवडणुकीच्या प्रचाराने अंतिम टप्पा गाठला आहे. तसा सर्वच पक्षांनी आपल्या प्रचाराची पातळीही खालच्या स्तरावर नेल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही पिंपरी चिंचवड येथील प्रचारसभेत बोलताना स्वत:वर आवर घालणे जमले नाही. बोलण्याच्या ओघात त्यांनी मुख्यमंत्र्यांबाबत एका ग्रामीण म्हणीचा पूर्वाध वापरत टोला लगावला. पवार यांच्या या बोलण्याने उपस्थितांमध्ये जरी हशा पिकला असला तरी राजकीय क्षेत्रात पवारांच्या वक्तव्याबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे. नागपूरचे लोक कष्टाळू व चांगले आहेत. त्यांना चांगलं नेतृत्व मिळाले असते तर या शहराचीही पिंपरी चिंचवड इतकंच काय रांजनगाव यापेक्षाही जास्त प्रगती झाली असती. परंतु, तिथल्या नेत्यांमध्येही ही कुवतच नाही, असे फडणवीस यांचे नाव न घेता मुख्यमंत्रीपद नशिबाने मिळाल्याचे सांगत आंधळ्याचा हात कुठं तरी… असं अर्धवट म्हणत मी जास्त काही सांगत नाही, असा टोला लगावला. शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी असे शब्द वापरल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा