पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (१८ सप्टेंबर) झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान अन्नदाता आर्थिक उत्पन्न संरक्षण योजनेला (पीएम – आशा) योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. सुमारे ३५ हजार कोटी रुपयांच्या या योजनेसह रब्बी हंगामासाठी पोषणमूल्य आधारित रासायनिक खतांच्या अनुदानासाठी २४ हजार कोटी रुपयेही मंजूर करण्यात आले आहेत.

पंतप्रधान अन्नदाता आर्थिक उत्पन्न संरक्षण अभियानाला (पीएम – आशा. प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान) केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून २०२५-२६ पर्यंत ३५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाचा योग्य भाव मिळावा, ग्राहकांना वाजवी दरात अन्नधान्य उपलब्ध व्हावे, असा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

gang of thieves who were preparing to robbed cash from Petrop pumps were arrested
पेट्रोल पंपावरील रोकड लुटण्याच्या तयारीतील चोरट्यांची टोळी गजाआड, चोरट्यांकडून पाच कोयते जप्त
Check the List of Highest-Selling Cars of the Year
‘या’ सात सीटर कारला लोकांची सर्वात जास्त पसंती,…
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
after nephew shocked while dancing group of people beat up uncle with stone
पुणे :नाचताना पुतण्याचा धक्का लागल्याचे निमित्त,टोळक्याकडून काकाला बेदम मारहाण
What Devendra Fadnavis Said About Uddhav Thackeray?
Devendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंची मला खरंच दया येते, त्यांना लाचारासारखं…”; देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका
Phoenix Mall , Pimpri-Chinchwad, Accused opened fire,
पिंपरी-चिंचवड: फिनिक्स मॉलच्या समोर गोळीबार करणाऱ्या आरोपीला अटक; ‘या’ कारणांमुळे केला गोळीबार
Lalbaugcha Raja Ganpati news
Lalbaugcha Raja : ‘लालबागचा राजा’चरणी अंबानींकडून २० किलो सोन्याचा मुकूट अर्पण, किंमत किती?
Narendra Modi Subhash Desai
Narendra Modi : “मला ८४ हजारांची पेन्शन मिळते, मोदींना किती रुपये मिळतील माहितीय का?”, सुभाष देसाईंनी सगळी आकडेवारी मांडली

हे ही वाचा…पुणे :नाचताना पुतण्याचा धक्का लागल्याचे निमित्त,टोळक्याकडून काकाला बेदम मारहाण

केंद्र सरकारने मूल्यसमर्थन योजना (पीएसएस) आणि मूल्य स्थिरीकरण फंड (पीएसएफ) या दोन योजनांचे एकत्रीकरण करून पीएम-आशा योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाच्या हमीभावाने खरेदीचे संरक्षण मिळणार आहे. शेतमालाच्या दरातील चढ-उतार टाळून शेतकऱ्यांचे नुकसान रोखण्यात येईल. तसेच, ग्राहकांना वाजवी दरात वर्षभर अन्नधान्य उपलब्ध होईल, याची काळजी घेण्यात येणार आहे.

हे ही वाचा…पिंपरी-चिंचवड: फिनिक्स मॉलच्या समोर गोळीबार करणाऱ्या आरोपीला अटक; ‘या’ कारणांमुळे केला गोळीबार

अशी होणार अंमलबजावणी

  • पहिल्या टप्प्यात कडधान्य, तेलबिया आणि खोबऱ्याची एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या २५ टक्के खरेदी करण्यात येईल. ही खरेदी नाफेड, एनसीसीएफसारख्या संस्थांच्या माध्यमातून होईल.
  • हमीभाव आणि प्रत्यक्षात झालेल्या खरेदीतील फरकाची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येईल.
  • बाजारात टंचाई होऊन, दरवाढ झाल्याच्या काळात या संस्थांकडून वाजवी दरात त्यांची विक्री करण्यात येईल, जेणेकरून ग्राहकांना वाजवी दरात अन्नधान्य उपलब्ध होईल.

रब्बी हंगामातील खतांसाठी २४ हजार कोटी

केंद्र सरकारने रब्बी हंगामातील रासायनिक खतांसाठी पोषणमूल्य आधारित २४,४७५ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. हे अनुदान नत्र, स्फुरद आणि पालाशयुक्त खतासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. जागतिक बाजारातील खतांच्या किमतीत झालेल्या वाढीचा परिणाम रब्बी हंगामावर होऊ नये, शेतकऱ्यांना वाजवी दरात रासायनिक खते मिळावीत, यासाठी ऑक्टोबर २०२४ ते मार्च २०२५, या काळात रब्बी हंगामातील पिकांसाठी वापरल्या जाणाऱ्या खतांसाठी खत कंपन्यांना हे अनुदान दिले जाणार आहे. त्यासाठी सरकारने नत्र, स्फुरद आणि पालाश खतांची मूळ किंमत निर्धारित केली आहे. त्या किमतीवर अनुदान दिले जाईल.