राज्यातील राजकीय संस्कृती हा चिंतेचा विषय झाला आहे. नेत्यांची वादग्रस्त विधाने आणि त्यावरील प्रतिक्रिया चिंताजनक आहेत. याबाबत राजकीय पक्षांनी एकत्र येऊन काही आचारसंहिता तयार करता येईल का, याचा विचार करावा, अशी सूचना राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी केली. केलेल्या आक्षेपार्ह विधानासंदर्भात अब्दुल सत्तार यांनी माफी मागितल्यानंतर हा विषय संपायला हवा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

हेही वाचा- पुणे: कुष्ठरोग निर्मूलनाचा दावा फोल; १४ वर्षांखालील मुलांमध्ये नव्याने संसर्ग

Amit Deshmukh statement caused unease among Congress workers in Latur print politics news
अमित देशमुख यांच्या विधानाने लातूरात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता
Ratan Tata Pet Dog came to pay him last tribute
मुक्या प्राण्याची माया! रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांचा…
aditya thackeray devendra fadnavis
“…तर इगो कुणाचा दुखावतोय, हे कळेल”; देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ आरोपाला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर!
ajit pawar nitin gadkari ladki bahin yojana statement
“…तर आम्ही लाडकी बहीण योजना सुरुच केली नसती”; नितीन गडकरींच्या ‘त्या’ विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया
praful patel on raj thackeray ladki bahin statement
राज ठाकरेंची लाडकी बहीण योजनेवर अप्रत्यक्षरित्या टीका; प्रफुल्ल पटेल म्हणाले, “ज्या लोकांना सरकारची…”
BJP leaders Demand to Give a chance to the old workers while pampering the new ones
नव्यांचे लाड करताना जुन्या कार्यकर्त्यांनाही संधी द्या! भाजप नेत्यांची नेतृत्वाकडे मागणी
arvind sawant replied to chandrasekhar bawankule
“उद्धव ठाकरेंना मविआतून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे” म्हणणाऱ्या चंद्रशेखर बावनकुळेंना ठाकरे गटाचे प्रत्युत्तर; म्हणाले…
supriya sule on balasaheb thorat cm post statement
Supriya Sule : “राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल”, बाळासाहेब थोरातांच्या विधानावर सुप्रिया सुळेंची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाल्या…

पाटील म्हणाले, अब्दुल सत्तार यांनी केलेले वक्तव्य चुकीचेच आहे. त्याचे समर्थन करणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या विधानासाठी माफीचा आग्रह धरला. सत्तार यांनी माफी मागितली आहे. पण माफी मागितल्यावर, दिलगिरी व्यक्त केल्यावर त्यावरील गदारोळ संपायला हवा. लोकांना अशा प्रकारची विधाने अजिबात आवडत नाहीत, याचा नेत्यांनी विचार करावा. लोकांना नेत्यांनी विकासावर बोलायला हवे आहे.

हेही वाचा- औद्योगिक धोरणांमध्ये बदल करण्याची राज्य सरकारची तयारी; उद्योगमंत्री उदय सामंत यांचे आश्वासन

‘अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा टेंभा मिरवणाऱ्यांनी दुसऱ्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणू नये’, असा टोला पाटील यांनी लगावला. ‘हर हर महादेव’ चित्रपटाला होणाऱ्या विरोधावर भाष्य करताना पाटील यांनी ‘मी अजून चित्रपट पाहिला नाही’, असे सांगितले. मात्र, विरोध करणारे प्रेक्षकांना चित्रपटगृहातून हुसकावून कसे लावतात? चित्रपटागृहाबाहेर त्यांनी पाट्या घेऊन उभे राहावे. विरोध करण्यासाठी उपलब्ध कायदेशीर मार्गाचा वापर केला जावा, अशा सूचनाही पाटील यांनी दिल्या आहेत

शिवसेना पहिल्यांदाच फुटली का? 

अब्दुल सत्तार यांच्या विधानाचे समर्थन करणार नाही. पण खोके हा विषय कसा सुरू झाला?, असा सवाल करून पाटील यांनी ते देखील लोकांना आवडत नाही, असे सांगितले. शिवसेना यापूर्वी फुटली नव्हती का? नारायण राणे, छगन भुजबळ यांना कोणी फोडले? त्यावेळी खोके नसतील, पेट्या होत्या. त्यामुळे एकांगी आरोप करायला नको. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची पक्षात घुसमट होत होती, त्यातून ते बाहेर पडले हे वास्तव आहे. त्यामुळे हे आरोप बंद व्हायला हवेत.