पुणे : बाळासाहेब कधी कधी चांगला सल्ला देतात, अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना दिली. महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरे यांनी बाहेर पडावे, असा सल्ला प्रकाश आंबेडकरांनी दिला आहे. त्यासंदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. सन २००१ ते २०११ मधील झोपडपट्टी धारकांना विनामूल्य घरे देण्याऐवजी अडीच लाखात घर देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासंदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, २००० नंतरच्या झोपडपट्टी धारकांना विनामूल्य घर देणे शक्य नव्हते. त्यामुळे अडीच लाखात घरे देण्याचा निर्णय घेण्यात आला. विरोधकांना अडीच वर्षांत जे करता आले नाही ते आम्ही केले असून वेगाने निर्णय घेणारे हे सरकार आहे.