यंदाचा फेब्रुवारी महिना हा गेल्या १४७ वर्षांतील सर्वात उष्ण फेब्रुवारी महिना ठरला असून, पुढील तीन महिने असेच ‘तापदायक’ राहतील, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने (आयएमडी) मंगळवारी वर्तवला. मार्च ते मे या महिन्यांदरम्यान गुजरात ते पश्चिम बंगाल पट्टय़ात उष्णतेच्या लाटा धडकतील, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. हा वाढता उकाडा असह्य ठरेलच; पण त्याचा परिणाम कृषी उत्पादनावरही होऊन महागाई ‘आयएमडी’चे ज्येष्ठ शास्त्रज्ञ एस. सी. भान यांनी मंगळवारी मार्च महिन्याबाबत हवामान अंदाजाची माहिती पत्रकार परिषदेत दिली. मार्चपासून मे महिन्यापर्यंतच्या काळात देशात सर्वत्रच सरासरीपेक्षा अधिक तापमानाची नोंद होण्याची शक्यता भान यांनी वर्तवली. १८७७ मध्ये फेब्रुवारी महिन्यात सर्वाधिक कमाल तापमान नोंदवण्यात आले होते, त्यानंतर फेब्रुवारी २०२३ हा सर्वात उष्ण फेब्रुवारी ठरला आहे. घटलेली चक्रीवादळांची संख्या, त्यामुळे झालेला मर्यादित पाऊस ही फेब्रुवारीतील उष्णतेची प्रमुख कारणे असल्याचे ते म्हणाले. त्याच वेळी मार्च महिना फेब्रुवारीपेक्षा उष्ण ठरेल, असा इशाराही त्यांनी दिला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा