पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या योजनांबाबत जनजागृती करण्यासाठी आयोजित भारत संकल्प यात्रा कसबा विधानसभा मतदारसंघाभोवती केंद्रित केल्याचे स्पष्ट होत आहे. कसबा विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या पराभवामुळे कसब्यातील बहुतांश ठिकाणी ही यात्रा आयोजित केली जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसभेची आगामी निवडणूक मार्च-एप्रिल महिन्यात होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शासकीय योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी केंद्र सरकारचा खटाटोप सुरू झाला आहे. त्यासाठी केंद्र सरकारने महापालिकेच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातही कसबा विधानसभा मतदारसंघात केंद्राच्या योजनांची जनजागृती केली जाणार आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत गुरुवारी कार्यक्रम होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरचित्रसंवाद पद्धतीने उपस्थितांबरोबर संवाद साधणार आहेत.

हेही वाचा – पुण्यात मनसैनिक इंग्रजी पाट्यांविरोधात आक्रमक, अनेक दुकानांवर दगडफेक

हेही वाचा – कात्रजचे दूध आजपासून दोन रुपयांनी स्वस्त

शहरातील १२५ ठिकाणी फिरत्या वाहनाच्या माध्यमातून नवीन लाभार्थ्यांची नोंदणी करणे, जनजागृती करणे, योजनांचा लाभ मिळवून देणे अशी कामे करण्यात येणार आहेत. महापालिकेने निश्चित केलेल्या ठिकाणी फिरते वाहन तीन तास थांबणार असून, त्याचे नियोजन क्षेत्रीय कार्यालयाकडे देण्यात आले आहे. मात्र पहिल्या टप्प्यात कसबा विधानसभा मतदारसंघाला प्राधान्य देण्यात आले आहे.

लोकसभेची आगामी निवडणूक मार्च-एप्रिल महिन्यात होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शासकीय योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी केंद्र सरकारचा खटाटोप सुरू झाला आहे. त्यासाठी केंद्र सरकारने महापालिकेच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातही कसबा विधानसभा मतदारसंघात केंद्राच्या योजनांची जनजागृती केली जाणार आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत गुरुवारी कार्यक्रम होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरचित्रसंवाद पद्धतीने उपस्थितांबरोबर संवाद साधणार आहेत.

हेही वाचा – पुण्यात मनसैनिक इंग्रजी पाट्यांविरोधात आक्रमक, अनेक दुकानांवर दगडफेक

हेही वाचा – कात्रजचे दूध आजपासून दोन रुपयांनी स्वस्त

शहरातील १२५ ठिकाणी फिरत्या वाहनाच्या माध्यमातून नवीन लाभार्थ्यांची नोंदणी करणे, जनजागृती करणे, योजनांचा लाभ मिळवून देणे अशी कामे करण्यात येणार आहेत. महापालिकेने निश्चित केलेल्या ठिकाणी फिरते वाहन तीन तास थांबणार असून, त्याचे नियोजन क्षेत्रीय कार्यालयाकडे देण्यात आले आहे. मात्र पहिल्या टप्प्यात कसबा विधानसभा मतदारसंघाला प्राधान्य देण्यात आले आहे.