पुणे : राज्य सहकारी बँकेबाबत कडक निर्णय घ्यावा लागला आणि त्याची राजकीय किंमत मोजावी लागली. राष्ट्रवादी काँग्रेसने सरकार पाडले. सरकार पडले नसते तर आघाडीचे सरकार आले असते आणि मराठा आरक्षणाचा प्रश्नही निकाली निघाला असता, असे राज्याचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे सोमवारी सांगितले.ते म्हणाले, की राज्याचा सहकार विभाग शिस्तीसाठी प्रसिद्ध नाही. सहकारातील गैरव्यवहार चीड आणणारे असून सहकारात अमूलाग्र बदल आणि सुधारणांची आवश्यकता आहे. मुख्यमंत्री असताना जेवढे बदल करता आले तेवढे केले.कॉम्पिटिटर्स फाउंडेशन आणि राजीव सातव विचार मंचातर्फे साखर संचालक संजयकुमार भोसले यांना दिवंगत खासदार, संसदरत्न राजीव सातव पुरस्कार चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आला. त्यावेळी त्यांनी सहकार क्षेत्रासंदर्भात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप केला. सह्याद्री फार्म्सचे अध्यक्ष विलास शिंदे, माजी मंत्री रजनी सातव, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, फाउंडेशनचे रवींद्र जायभाय, मनोज मते यावेळी उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा