चिन्मय पाटणकर, लोकसत्ता

पुणे: प्रागैतिहासिक काळातील संस्कृती दर्शवणाऱ्या कातळशिल्पांना राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळण्यासाठीचा प्रस्ताव २०१८मध्येच सादर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र गेल्या चार वर्षांत तांत्रिक कारणांमुळे कातळशिल्पांना राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळू शकलेला नाही. मात्र आता आठ कातळशिल्पांना राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

Investigating land fragmentation projects letter of MHADA  a committee has been formed by the Nashik district administration
भूखंडाचे तुकडे करणाऱ्या प्रकल्पांची चौकशी; ‘म्हाडा’च्या पत्रानुसार नाशिक जिल्हा प्रशासनातर्फे समिती स्थापन
Shantanu Naidu ratan tata youngest friend
कोण आहे ३० वर्षांचा पुणेकर शांतनू नायडू? त्याची…
Pench tiger project administration, Villagers
पेंच व्याघ्रप्रकल्प प्रशासनाविरोधात गावकरी रस्त्यावर
lokmanas
लोकमानस: घोषणांनी, वायद्यांनी राज्याचा विकास होईल?
The state government plans to start work on ambitious projects in the state before the implementation of the code of conduct for assembly elections
४५ हजार कोटींच्या प्रकल्पांना गती; आचारसंहितेपूर्वी पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन करण्याच्या हालचाली
guidelines for prasad, Food and Drug License Holders,
देशामधील सर्वच मंदिरांतील प्रसादासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करा; ऑल फूड ॲण्ड ड्रग लायसन्स होल्डर फेडरेशनची मागणी
Cleanliness of Pratapgad in view of the visit of the UNESCO team satara
‘युनेस्को’ पथकाच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर प्रतापगडची स्वच्छता
Food and Drug Administration seized 285 liters of adulterated milk in Mumbai news
मुंबईत २८५ लिटर भेसळयुक्त दूध जप्त; अन्न व औषध प्रशासनाची मालाडमध्ये कारवाई

रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथे मोठ्या प्रमाणात कातळशिल्पे आहेत. गेल्या वर्षीच युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या तात्पुरत्या यादीत बारसू गावातील कातळशिल्पासह एकूण आठ ठिकाणची कातळशिल्पे समाविष्ट करण्यात आली. त्याशिवाय आता कातळशिल्पांच्या संवर्धनासाठी राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळण्यासाठीचा प्रस्ताव २०१८मध्येच सादर करण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे.

आणखी वाचा-जागतिक तापमानवाढीचे पुढील पाच वर्षांत नवे उच्चांक; जागतिक हवामानशास्त्र संस्थेचा अंदाज

स्थानिक अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही वर्षांत रत्नागिरी-राजापूर परिसरात मोठ्या प्रमाणात कातळशिल्पांचा शोध लागला आहे. प्रागैतिहासिक काळातील संस्कृती या कातळशिल्पांतून दिसते. या कातळशिल्पांच्या संवर्धनासाठी स्थानिक पातळीवर जनजागृतीचे काम करण्यात येत आहे. तसेच या कातळशिल्पांना राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळाल्यास त्यांचे जतन संवर्धन अधिक चांगल्या पद्धतीने करणे शक्य आहे. त्या दृष्टीनेच कातळशिल्पांना राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळण्याचा प्रस्ताव २०१८मध्येच राज्य पुरातत्त्व विभागाला सादर करण्यात आला होता. मात्र अद्याप कातळशिल्पांना राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळू शकलेला नाही.

कातळशिल्पांना राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळण्यासाठीचा प्रस्ताव २०१८मध्ये सादर झाला होता, ही खरी गोष्ट आहे. मात्र राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा देण्यासाठीची एक प्रक्रिया आहे. बहुतांश कातळशिल्पे खासगी जागांमध्ये आहेत. त्यामुळे राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा देण्यासाठी त्या जागा मालकांशी चर्चा, त्यांची परवानगी, जागेचा सात-बारा मिळवणे आदी तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यास वेळ लागला. मात्र ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात असून, आठ कातळशिल्पांना राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा दिला जाणार आहे, असे राज्याच्या पुरातत्त्व विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांनी सांगितले.