पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यातील पाण्याबाबतचा निर्णय कालवा समितीच्या बैठकीत घेतला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याचे पालकमंत्री आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान केले. ‘पाणी सोडा म्हणून माझ्यावर दबाव असतो. पण पालकमंत्री म्हणून मला पाणी सोडता येत नाही. त्यासाठी चर्चा करून निर्णय घ्यावा लागतो,’ असे पाटील यांनी सांगितले. 

भारती विद्यापीठाचा स्थापना दिन आणि जीवनसाधना गौरव पुरस्कार कार्यक्रमात पाटील बोलत होते. सामाजिक कार्यकर्ते शांतीलाल मुथा, इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. जयसिंगराव पवार यांना पुरस्काराने गौरवण्यात आले. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. अभय जेरे, विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, कार्यवाह डॉ. विश्वजित कदम, कुलगुरू डॉ. विवेक सावजी, भारती विद्यापीठ मेडिकल फाउंडेशनच्या कार्यकारी संचालक डॉ. अस्मिता जगताप आदी या वेळी उपस्थित होते.

Navi Mumbai Semiconductor Project, Eknath Shinde,
राज्यात आमचेच सरकार असणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा
21st September Rashi Bhavishya & Marathi Panchang
२१ सप्टेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थीला बाप्पा करणार ‘या’…
Girish Mahajan, High Court, Girish Mahajan news,
मंत्री गिरीश महाजनांवर उच्च न्यायालयाची नाराजी, काय आहे प्रकरण?
Ajit Pawar private secretary, Supriya Sule,
बारामतीत शासकीय कार्यक्रमात अजित पवारांंचा खासगी सचिव व्यासपीठावर?; राजशिष्टाचारात बदल केले का? सुप्रिया सुळेंचा सवाल
Pratap Chikhalikar, Nanded by-election,
नांदेड पोटनिवडणूक लढण्यास प्रताप चिखलीकर पुन्हा इच्छुक
Ramdas Athawale, Shivaji maharaj statue, sculptor,
शिव पुतळा उभारण्याचे काम नवख्या शिल्पकाराला देणं चुकीचं होतं – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
Ladki Bahin Yojana, Devendra Fadnavis, BJP, Congress, Anil Wadpalliwar, High Court, women s schemes, election strategy, Eknath Shinde, Nana Patole, Maharashtra politics,
‘लाडकी बहीण’ योजनेमुळे महायुतीच्या निशाण्यावर आलेले वडपल्लीवार आहेत तरी कोण ?
Cm Eknath Shinde was ordered by Nagpur Bench of Bombay High Court to reply within three weeks
Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना न्यायालयाची तंबी, म्हणाले “उत्तर द्या, नाहीतर योग्य आदेश द्यावे लागतील”

हेही वाचा >>> पिंपरी-चिंचवड शहराचे विद्रुपीकरण करणारे जाहिरात फलक काढा, श्रीरंग बारणे यांची प्रशासनाला सूचना

पाटील म्हणाले, की पतंगराव कदम यांचे सर्व राजकीय नेत्यांशी पक्षाच्या पलीकडे संबंध होते;पण आज राजकारणात दुसऱ्या पक्षाची व्यक्ती शत्रू मानण्यासारखी परिस्थिती आहे. पक्षापलीकडे संबंध दुर्मीळ झाले आहेत. शिव्यांचं भांडार राजकारणात वापरले जाते. आजच्या काळात नवसंशोधनाला पर्याय नाही. नवे शैक्षणिक धोरण व्यवसायाभिमुख आहे. रोजच्या जीवनात उपयुक्त ठरणारे शिक्षण हा या धोरणाचा गाभा आहे.