पुणे : ‘पुरेशा देखभाल दुरुस्तीअभावी वीजयंत्रणा सातत्याने अपयशी ठरत आहे. त्यामुळे वीजबिल भरूनही ग्राहकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे,’ असा आरोप सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी सोमवारी केला. ‘देखभाल-दुरुस्तीवरील खर्च संचलन व देखभाल यासाठी मान्य खर्चाच्या २० टक्क्यांपेक्षा कमी झाला, तर त्यातून वाचलेले पैसे अन्य कोणत्याही कारणासाठी वापरता येणार नाहीत, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. याचा मूळ उद्देश नागरिकांना विनाव्यत्य वीजपुरवठा मिळण्यासाठी महावितरणने देखभाल-दुरुस्तीवर पुरेसा खर्च करावा, असा आहे. मात्र, महावितरणने राज्य वीज नियामक आयोगाकडे दाखल केलेल्या पुढील पाच वर्षांसाठीच्या वीजदर प्रस्तावात नमूद केले आहे, की २०२२-२३ मध्ये देखभाल-दुरुस्तीसाठी २० टक्क्यांऐवजी १३.६ टक्केच आहे, तर २०२३-२४ मध्ये तो १५.५ टक्के आहे. याचा अर्थ या दोन वर्षांत महावितरणने देखभाल-दुरुस्तीवर केलेला खर्च आवश्यकतेपेक्षा जवळपास एक हजार कोटी रुपयांनी कमी आहे, ज्याचा फटका ग्राहकांना बसला आहे,’ असे वेलणकर यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा