पुणे : मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाचा फटका पुणे-मुंबई दरम्यानच्या रेल्वे सेवेला सोमवारी बसला. मुंबईत खडीवली, टिटवाळा आणि कसारा या ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने दोन्ही शहरांदरम्यान धावणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या. अचानक गाड्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे हाल झाले.

मुंबईत मुसळधार पाऊस झाल्याने अनेक भागांत लोहमार्गांवर पाणी साचले आहे. यामुळे रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. यामुळे पुणे-मुंबई दरम्यानच्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या. पुण्याहून मुंबईसाठी सुटणाऱ्या सिंहगड एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन एक्स्प्रेस, डेक्कन एक्स्प्रेस, इंटरसिटी एक्स्प्रेस या गाड्या सोमवारी रद्द करण्यात आल्या. याचबरोबर मुंबईहून पुण्यासाठी सुटणाऱ्या सिंहगड एक्स्प्रेस, इंटरसिटी एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन एक्स्प्रेस, आणि डेक्कन एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या.

Meteorological department predicted rain in Mumbai
मुंबईत रविवारी हलक्या सरींचा अंदाज
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
There has increase in number of potholes in Dronagiri node of Uran during monsoon
द्रोणागिरी परिसर खड्ड्यांत; पाऊस थांबल्याने मार्गावरील धुळीच्या उधळणीने प्रवासी आणि नागरिक त्रस्त
Water Logging due to heavy rainfall at Bhandup railway station.
Mumbai Local Train Updates : पावसामुळे १०० लोकल फेऱ्या रद्द; मेल-एक्स्प्रेस आठ तास खोळंबल्या
Singapore Trains
Singapore Railway : सिंगापूरचं मुंबई: पावसामुळे रेल्वेसेवा कोलमडली; पण प्रवाशांसाठी ‘या’ सुविधाही पुरवल्या!
central railway cancelled 10 ac local service
मध्य रेल्वेचा ‘पांढरा हत्ती’ प्रवाशांसाठी त्रासदायक; वातानुकूलित लोकलच्या दहा फेऱ्या रद्द
Harbor route disrupted, Harbor route local railway,
मुंबई : हार्बर मार्ग विस्कळीत
Trans Harbor route affected due to technical fault near Nerul railway station
नेरुळ येथे तांत्रिक बिघाड, ट्रान्स हार्बरची रेल्वे वाहतुक विस्कळीत, ठाणे, ऐरोली, रबाळे सह महत्त्वाच्या स्थानकांत प्रवाशांची गर्दी उसळली

हेही वाचा >>>अखेर ठरलं! पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलबाबत मोहोळांची मोठी घोषणा

रेल्वेने दैनंदिन पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. ऐनवेळी गाड्या रद्द कऱण्यात आल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. अनेक प्रवाशांना इतर पर्यायी साधनांनी प्रवास करावा लागला. रेल्वे प्रशासनाकडून पुणे-मुंबई दरम्यानच्या घाट परिसरावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. या घाट भागात पावसाळ्यात अनेक वेळा दरडी कोसळतात. त्यामुळे दुर्घटना टाळण्यासाठी रेल्वेकडून सावधगिरीची पावले उचलली जात आहेत.