शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख धरणांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाल्याने पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने घेतला आहे. त्यामुळे शहराच्या सर्व भागाला आता नियमित पाणीपुरवठा होणार आहे. त्याबाबतची अधिकृत घोषणा येत्या काही दिवसांत होण्याची शक्यता आहे.

पानशेत, वरसगांव, टेमघर आणि खडकवासला या चार धरणातून शहराला पाणीपुरवठा होतो. यंदा चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस न झाल्याने धरणातील पाण्याने तळ गाठला होता. त्यामुळे चार जुलैपासून ११ जुलैपर्यंत पाणीकपात करण्याचा निर्णय पाणीपुरवठा विभागाने घेतला होता. त्यानुसार शहरात एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. दरम्यान, आषाढी एकादशी आणि बकरी ईद या सणांमुळे आठ जुलै ते अकरा जुलै पर्यंत पाणीकपात तात्पुरती रद्द करण्यात आली होती. या दरम्यान धरण परिसरात संततधार सुरू झाल्याने २६ जुलै पर्यंत नियमित पाणीपुरवठा करण्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार सध्या शहरात नियमित पाणीपुरवठा सुरू आहे.

Water from 19 private purification projects on Sinhagad Road is contaminated
‘त्या’ १९ खासगी शुद्धीकरण प्रकल्पातील पाणी देखील दुषितच!
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
BMC Budget 2025 Live Updates
कचरा संकलन शुल्काचा मुंबईकरांवर भार? महापालिकेचा आज अर्थसंकल्प
Mumbai corporation 540 crore cleaning drains monsoon
नाल्यांच्या सफाईसाठी ५४० कोटींचा खर्च अपेक्षित
Thane Water Cut Supply Disrupted Due to Power Outage at Temghar Pumping Station
ठाणेकरांपुढे पाणी संकट; टेमघर पाणी पुरवठा केंद्रातील वीज यंत्रणेत बिघाड 
Review, Blue Red Flood Lines, Mula-Mutha River,
पुणे : नदीपात्राची निळी रेषा, लाल रेषा बदलणार?
Replantation of 2097 trees for Thane Municipal Headquarters
६३१ वृक्ष तोडण्याचा प्रस्ताव; ठाणे महापालिका मुख्यालयासाठी २०९७ वृक्षांचे पुनर्रोपण
Pune Municipal Corporation has decided to make it mandatory for tanker drivers to obtain license
पाणी नक्की कुठून घेतले, कुठे दिले हे सांगावे लागणार!

धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मान्सून सहा जुलैपासून सक्रिय झाला. खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात सुरू असलेला दमदार पाऊस ओसरला असला तरी चारही धरणांत मिळून वीस अब्ज घनफूट (टीएमसी) एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे आता पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून घेण्यात आला असून शहराच्या सर्व भागाला नियमित पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरूद्ध पावसकर यांनी सांगितले.

Story img Loader