लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : स्मार्ट सिटी प्रकल्पाचा फटका पुणे महापालिकेला बसला आहे. शहरातील रस्त्यांवरील वाहतूक नियंत्रित करण्यासाठी स्मार्ट सिटीने उभारलेल्या ॲडॅप्टिव ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (एटीएमएस) यंत्रणेचा खर्च भागविण्यासाठी ४४ कोटी रूपयांचा निधी द्यावा, अशी मागणी स्मार्ट सिटीने महापालिकेकडे केली आहे. पुढील चार वर्षांसाठी ही रक्कम एकरकमी द्यावी. तसेच, कंपनीकडे पैसे नसल्याने पालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या ३४ गावांमध्ये एटीएमएस यंत्रणा उभारण्यासाठी १९२ कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी पालिकेकडे करण्यात आली आहे.

Finance Minister approves purchase of 25000 privately owned st buses in five years
गाव तेथे नवी एसटी धावणार; पाच वर्षांत २५ हजार स्वमालकीच्या ‘लाल परी’ बस घेण्यास अर्थमंत्र्यांची मान्यता
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Transport Minister Pratap Sarnaik urged creating role model for sustainable environment friendly development taking place at open space of ST
एसटीची बस स्थानके सुंदर करण्यासाठी वास्तुविशारदांनी योगदान द्यावे, परिवहन मंत्री
mmrda invited tenders for direct access route from Badlapur to Mumbai reducing congestion
बदलापूरहून थेट मुंबई, नवी मुंबई काही मिनिटात, एक्सेस कंट्रोल महामार्गाच्या प्रकल्प आराखड्यासाठी निविदा मागवल्या
district administration meeting for metro car shed construction in Mogharpada ghodbunder
मोघरपाडा कारशेडची कोंडी फोडण्याचे प्रयत्न सुरु; शेतकऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत जिल्हा प्रशासनाकडून पुनर्रच्चार
Travelling on ST without a smart card is difficult Pune news
‘स्मार्ट कार्ड’विना ‘एसटी’ प्रवास अडचणीचा
butterfly bridge over pawana river remains incomplete even after deadline expired
‘बटरफ्लाय’ पुलाचे ‘उड्डाण’ केव्हा? आतापर्यंत ४० कोटींचा खर्च; सात वर्षांनंतरही काम अपूर्ण
road widening, Jogeshwari,
मुंबई : जोगेश्वरीत रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा, अडथळा ठरणाऱ्या ५६ बांधकामांवर पालिका कारवाई करणार

केंद्र सरकारने शहरातील औंध, बाणेर, बालेवाडी भागांसह इतर ठिकाणी महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्याासाठी ‘स्मार्ट सिटी’ कंपनी सुरू केली होती. मात्र, याच कंपनीने राबविलेल्या प्रकल्पाचा भुर्दंड आता पालिकेला सहन करावा लागणार आहे. शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी, तसेच प्रमुख रस्त्यांवरील कोणत्या चौकात वाहनांची अधिक गर्दी असते. त्या रस्त्यावरील वाहतूक नियंत्रण दिव्यांची वेळ परिस्थितीनुसार कमी अधिक करण्याची स्वंयचलित यंत्रणा स्मार्ट सिटीने राबविली.

आणखी वाचा-शाळेच्या आवारात मुलावर अत्याचार, अनैसर्गिक कृत्य प्रकरणी शाळकरी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

विकासकामे आणि निधी

  • पहिल्या टप्प्यात शहरातील मुख्य रस्त्यांवरील प्रमुख १०० हून अधिक चौकांमध्ये ही यंत्रणा बसविण्यात आली. यासाठी सुमारे शंभर कोटी रुपये खर्च करण्यात आला.
  • या यंत्रणेच्या पाच वर्षांच्या देखभाल दुरुस्तीसाठी ५७ कोटी रुपये महापालिका देणार आहे. यापैकी पहिल्या हप्त्याचे १३ कोटी रुपये महापालिकेने दिले आहेत. उर्वरित ४४ कोटी रुपये पालिकेला द्यावे लागणार आहेत. ही रक्कम एकरकमी द्यावी, अशी मागणी स्मार्ट सिटीने पालिकेकडे केली आहे.
  • महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या नवीन ३४ गावांमधील १०० प्रमुख चौकांमध्ये ही यंत्रणा उभारण्याचा आराखडा सादर केला आहे. देखभाल दुरुस्तीसह १९२ कोटी रुपयांचा खर्च महापालिकेने करावा. यंत्रणा उभारणे आणि देखभाल दुरुस्ती स्मार्ट सिटी कंपनी करील, असेही स्मार्ट सिटीने पालिकेला पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.

कामे अपूर्ण

स्मार्ट सिटीने बसविलेल्या एटीएमएस यंत्रणेतील कंट्रोल कमांड सेंटर आणि अन्य काही कामे अपूर्ण आहेत. कामासाठीचा कंपनीकडील निधी संपल्याने उर्वरित कामे पुर्ण करण्याचे आणि त्याची देखभाल दुरुस्ती करण्याचे आव्हान स्मार्ट सिटीपुढे आहे. या पार्श्वभूमीवर स्मार्ट सिटी कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी महापालिकेला देखभाल दुरूस्तीसाठी उर्वरीत ४४ कोटी रुपये एकरकमी देण्याची मागणी केली आहे.

आणखी वाचा-चाकण एमआयडीसीतील गुन्हेगारांवर आता जरब; पोलीस आयुक्तांचा इशारा, “कंपनी व्यवस्थापनाला त्रास दिल्यास…”

वाहतूक कोंडी कायम

स्मार्ट सिटीने शहरातील वाहतूक गतिमान करण्यासाठी एटीएमएस यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतला. याच्या देखभाल दुरूस्तीचा खर्च महापालिकेकडून घ्यायचा असा प्रस्ताव ठेवला. त्याला महापालिकेतील तत्कालीन सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी मान्यताही दिली. या प्रकल्पांतर्गत शहरातील प्रमुख चौकातील जुनी सिग्नल यंत्रणा काढून त्याठिकाणी आधुनिक सेन्सर आणि कॅमेरे असलेले वाहतूक नियंत्रण दिवे उभारले गेले. इंटरनेटद्वारे हे सर्व कॅमेरे सेंट्रल कमांड सेंटरशी जोडण्यात आले. वाहने ठराविक गतीने मार्गक्रमण करू शकतील, अशी ही यंत्रणा असेल, असा दावा करण्यात आला. मात्र नवीन यंत्रणा बसविल्यानंतर या रस्त्यांवरील आणि चौकातील वाहतूक कोंडी अद्याप सुटलेली नाही.

Story img Loader