पिंपरी : पवनेपेक्षा इंद्रायणीचे पाणी हे अधिक दूषित असल्याने महापालिकेला जलशुद्धीकरणासाठी कोट्यवधी रुपये खर्च करावे लागत आहेत. पवना नदीतील ५१० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी शुद्ध करण्यासाठी वर्षाला सुमारे दहा कोटी रुपये, तर इंद्रायणी नदीतून उचलण्यात येणाऱ्या ८० दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रियेसाठी सात कोटी रुपये खर्च होत आहेत.

पवना धरणातून नदीवाटे आलेले पाणी रावेत येथील बंधाऱ्यातून उचलले जाते. तेथून निगडी, सेक्टर क्रमांक २३ येथे शुद्ध करुन संपूर्ण शहराला वितरित केले जाते. पवना नदीतून दररोज ५१० दशलक्ष लिटर पाणी उचलले जाते. रासायनिक द्रव्य, पावडरचा वापर करुन पाणी शुद्ध केले जाते. त्यासाठी एका वर्षाला दहा कोटी रुपयांचा खर्च येतो. आंद्रा धरणातून ८० दशलक्ष लिटर पाणी हे निघोज येथील इंद्रायणी नदीवरील बंधाऱ्यातून उचलले जाते. अशुद्ध पाणी भूमिगत जलवाहिनीतून चिखली जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाते. तेथे पाण्यावर प्रक्रिया करुन समाविष्ट भागातील गावांना पाणीपुरवठा केला जातो. हे पाणी शुद्ध करण्यासाठी एका वर्षाला सात कोटी रुपयांचा खर्च येतो, अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली.

Radhekrishna Group, Dahi Handi,
पुणे : सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडी कसबा पेठेतील राधेकृष्ण ग्रुप ने सात थर लावून फोडली
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
pcmc chief shekhar singh got angry on officials for watching mobile
पिंपरी : बैठकीत अधिकारी मोबाईल पाहण्यात दंग, आयुक्त संतापले; म्हणाले…
passengers had to be pulled out of water along with their bags and belongings at pune railway station
पुणे रेल्वे स्थानक ‘पाण्यात’! बॅग, सामानासह पाण्यातून वाट काढण्याची प्रवाशांवर वेळ
pune, pimpri chinchwad, dahi handi, swapnil Kusale, Olympic Medalist Swapnil Kusale, Olympic medalist, Hindu nation,
आपलं हिंदू राष्ट्र वाढलं पाहिजे – स्वप्नील कुसाळे
Supriya Sule, Baramati Assembly, Supriya Sule on Baramati Assembly, candidate, Ajit Pawar, Jay Pawar , Yugendra Pawar, NCP, Sharad Pawar
बारामती विधानसभा उमेदवाराबद्दल खासदार सुप्रिया सुळेंचे मोठे वक्तव्य !
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
constable commits suicide marathi news
पुणे: महिला पोलीस शिपायाची इंद्रायणी नदीत उडी; तरुणाने वाचवण्याचा प्रयत्न केला पण…

हेही वाचा >>> पिंपरी : बैठकीत अधिकारी मोबाईल पाहण्यात दंग, आयुक्त संतापले; म्हणाले…

आंद्रा धरण ते निघोजे बंधारा हे अंतर २२ किलोमीटर आहे. इंद्रायणीच्या दोन्ही बाजूस ३४ गावे आहेत. नदीलगत चाकण, तळेगाव दाभाडे एमआयडीसीचा परिसर आहे. गावांमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नाहीत. सांडपाणी थेट नदीत मिसळते. औद्योगिक कंपन्यांमधील रसायनमिश्रीत पाणीही नदीत सोडण्यात येते. इंद्रायणीचे पाणी जास्त दूषित असल्याने शुद्धीकरणासाठी केमिकल आणि पावडरचा अधिक वापर करावा लागत आहे. परिणामी, इंद्रायणीतून उचलण्यात येणाऱ्या ८० दशलक्ष लिटर पाण्यावरील प्रक्रियेसाठी वर्षाकाठी सात कोटी रुपयांचा खर्च करावा लागत आहे.

सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचा अभाव पवना धरण ते रावेत बंधारा हे अंतर ३२ किलोमीटर आहे. पवना नदीच्या दोन्ही बाजूस बारा गावे आहेत. उर्सेत एमआयडीसी भाग असून मोठे गृहप्रकल्प उभे राहत आहेत. अनेक गावांमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) नाहीत. त्यामुळे नदी पाणी प्रदूषित होते. मात्र, त्याचे प्रमाण इंद्रायणी नदीपेक्षा कमी असल्याने पाणी शुद्धीकरणास खर्च कमी येतो.