लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: पाणीबचतीसाठी दर गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येत असल्याने लाखो पुणेकरांना पाणी बंदनंतरचे काही दिवस पाणीबाणीला सामोरे जावे लागत आहे. मात्र, पाणीकपातीमध्येही महापालिकेकडून टँकरमाफियांसाठी पाणीच पाणी दिले जात असल्याची वस्तुस्थिती पुढे आली आहे. दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवताना टँकर भरणा केंद्रही बंद ठेवण्याचा निर्णय असतानाही टँकर भरणा केंद्रातून राजरोसपणे टँकर भरले जात असून, टँकरमाफियांसाठी पायघड्या का, असा प्रश्न उपस्थित होण्यास सुरुवात झाली आहे.

NGO , social work, transparency, accountability,
संस्थांची संस्थाने होताना..
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
All-party leaders oppose recommendation to change formula for equitable water distribution in Jayakwadi dam
जायकवाडी समन्यायी पाणी वाटपाचे सूत्र बदलण्याच्या शिफारशीच्या विरोधात सर्वपक्षीय नेते
Review, Blue Red Flood Lines, Mula-Mutha River,
पुणे : नदीपात्राची निळी रेषा, लाल रेषा बदलणार?
bmc plans to concrete all roads but residents oppose concreting in their area
आम्हाला काँक्रिटिकरण नको, वांद्रे आणि मरीन ड्राईव्हच्या राहिवाशांची मागणी
youths Ambernath questions republic day hoardings future corporators
प्रजासत्ताकदिनी तरूणांनी वेधले लक्ष ; प्रजासत्ताक दिनाचे बॅनर का नाहीत, भावी नगरसेवकांना सवाल
Increase in honorarium of women who provide information about illegal abortions say Prakash Abitkar
अवैध गर्भपाताची माहिती देणाऱ्या महिलांच्या मानधनात वाढ – आबिटकर
mmrdas third anti Mumbai struggle begins in 124 villages of Uran, Panvel and Pen talukas for ksc complex lines of BKC in Mumbai
एमएमआरडीएच्या तिसऱ्या मुंबईच्या भूसंपादनाला विरोध, शेतकऱ्यांच्या गावोगावीच्या जनजागृतीला सुरुवात

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा कमी असल्याने दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी १८ मेपासून सुरू झाली आहे. संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद ठेवल्यानंतर पुढील दोन ते तीन दिवस शहराच्या अनेक भागांत अपुरा, कमी दाबाने आणि विस्कळीत पाणीपुरवठा होत आहे. त्याबाबतच्या शेकडो तक्रारी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे करण्यात आल्या आहेत. त्यामुळे गेल्या महिन्याभरापासून पुणेकरांसाठी पाणीबाणी सुरू आहे. त्या विरोधात नागरिक, संस्था आणि राजकीय पक्षांनीही आंदोलने केली आहेत. मात्र पाणीकपात केवळ पुणेकरांसाठीच मर्यादित असल्याचे आणि पाणीकपातीमध्ये टँकरमाफियांचे उखळ पांढरे होत असल्याचेही या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा… ससूनमधील रुग्णांच्या रांगा कमी होणार; आता वेळीच उपचार

पाणीकपातीच्या निर्णयानुसार गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद असताना महापालिकेच्या पद्मावती टँकर भरणा केंद्रांवर टंकरची लांबच लांब रांग लागल्याची तक्रार राष्ट्रवादी अर्बन सेलचे नितीन कदम यांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे केली आहे. पाणीबचतीसाठी टँकर भरणा केंद्रही बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने घेतला होता. मात्र त्यानंतरही टँकर भरणा केंद्रांमधून टँकरला पाणीपुरवठा केला जात असून, पाणीकपातीचा निर्णय टँकरचालकांना लागू नाही का, अशी विचारणाही नितीन कदम यांनी केली आहे.

हेही वाचा… पुणे: बकरी ईदला जनावरांची वाहतूक करताय? आरटीओकडून अनेक निर्बंध

शहराची तहान भागविण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून दररोज एक हजार ४०० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी धरणातून उचलण्यात येते. महापालिका हद्दीत नव्याने २३ गावांचा समावेश झाल्याने या गावांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी महापालिकेकडे आहे. प्रतिदिन एक हजार ४०० दशलक्ष लिटर पाणी घेण्यात येत असतानाही शहराच्या अनेक भागात सध्या विस्कळीत, अपुरा पाणीपुरवठा होत असल्याची वस्तुस्थिती आहे. शहराच्या अनेक भागात सध्या पाणीटंचाई असून, पाणीकपातीचा निर्णय टँकरमाफियांसाठी घेतल्याचा आरोपही त्यामुळे होत आहे.

प्रामाणिकपणे मिळकतकर भरणारे पुणेकर पाण्यासाठी आटापिटा करत असताना आणि सहकार्याची भूमिका ठेवून प्रशासनाला मदत करत असताना टँकर माफियांसाठी पायघड्या घातल्याचे दिसत आहे. या सर्व प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई होणे अपेक्षित आहे अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल. – नितीन कदम, अध्यक्ष, राष्ट्रवादी अर्बन सेल

Story img Loader