सुहास किर्लोस्कर
गेल्या २५ वर्षांतील सांस्कृतिक स्थित्यंतरे याचा विचार करताना २००० साली पुण्यामध्ये कोणते बदल घडणे सुरू झाले होते, याचा शोध घेणे योग्य ठरेल. १९९७ मध्ये हिंजवडी येथे आणि २००५ मध्ये कल्याणीनगर येथे आय. टी. पार्क सुरू झाले. मुंबई, बेंगळुरू, चेन्नई येथे माहिती तंत्रज्ञान कंपन्यांची गर्दी झाल्यामुळे विस्तार होण्यास वाव असलेल्या पुण्याची निवड झाली होती. या निमित्ताने अ-मराठी युवा वर्ग नोकरीसाठी पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर येण्यास सुरुवात झाली. त्याच अनुषंगाने २००५ पासून पुण्यातून दुबई, सिंगापूर आणि फ्रँकफर्ट येथे विमान सेवा सुरू झाली. याचीच परिणती नांदेड सिटी, अमानोरा पार्क, मगरपट्टा सिटी सारख्या कॉम्प्लेक्समधून पुण्याचा विस्तार होऊ लागला. मल्टी-क्युझिन अर्थात देशो-देशीच्या पाककृती असणारी हॉटेल/ रेस्टॉरंट पुण्यात हात-पाय पसरू लागली. एकूणच पुण्याचे रुपडे बदलून कॉस्मोपॉलिटन शहर होऊ लागले. त्याचे प्रतिबिंब सांस्कृतिक कार्यक्रमात पडणे ओघाने आलेच.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा