डॉ. अ. ल. देशमुख
पुण्याचा भौगोलिक भाग किंवा अत्यंत पोषक वातावरणामुळे गेल्या पंचवीस वर्षांत शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार खूप वेगाने झाला. सुसह्य हवामान, सांस्कृतिक वारसा, औद्योगिक विकास, स्वच्छ आणि शुद्ध पाणीपुरवठा, उत्तम आरोग्य व्यवस्थापन यामुळे शहराच्या लोकसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्याचा परिणाम शिक्षण क्षेत्रावर झाल्याचे दिसून येते. शहरातील मध्यवर्ती पेठांच्या तुलनेत शहराच्या परिघावरील परिसरात नव्या शाळा वेगाने निर्माण झाल्या आहेत. माध्यमिक शिक्षणाला व्यावसायिक शिक्षणाची जोड देण्याच्या दृष्टीने किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम, द्विलक्ष्यी अभ्यासक्रम, माहिती-तंत्रज्ञान अभ्यासक्रम सुरू झाले. राज्य सरकारच्या शालेय शिक्षणातील सर्व महत्त्वाच्या संस्था म्हणजे बालभारती, राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, राज्य मंडळ, शिक्षण आयुक्तालय, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण संचालनालय अशा संस्था पुण्यातच आहेत. त्यामुळे राज्याचे शैक्षणिक धोरण पुण्यातून ठरते, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. पुण्यात येणारी नवीन योजना पुढील पाच वर्षांत राज्यभरात पोहोचते, असा आजवर अनुभव आहे. त्यामुळे भविष्यात पुण्याकडे सबंध महाराष्ट्राचे लक्ष राहणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा