डॉ. वैशाली अनगळ
भारतातील पहिली बहुमजली रहिवासी इमारत विसाव्या शतकाच्या सुरुवातीस १९१५ साली मुंबई येथे उभी राहिली. त्या इमारतीचं नाव सारस्वत रहिवासी गृहनिर्माण संस्था. महाराष्ट्र सहकारी संस्था. अधिनियम, १९६०मध्ये अस्तित्वात आला, तर १९७४ मध्ये महाराष्ट्र अपार्टमेंट मालकी कायदा अस्तित्वात आला. पुढे महाराष्ट्रात, वाढत्या शहरी शहरीकरणाच्या रेट्यात मुंबई, पुणे यासारख्या मोठ्या शहरांमध्ये १९७० ते १९९० या दोन दशकांमध्ये तीन-चार मजली सदनिका इमारती बांधण्याला पेव फुटले. शहरात नोकरीच्या शोधात येणारे वाढते चाकरमाने आणि शहरातील गावठाण भागात असलेली गर्दी यामुळे शहराबाहेरील भागात अशा सदनिकांचा खूप मोठ्या प्रमाणावर विकास झाला. या सदनिका आकाराने छोट्या, साधारण एक किंवा दोन शयनगृहे असलेल्या, एक स्नानगृह आणि एक संडास असलेल्या आणि नवीन उदयास आलेल्या मध्यमवर्गीय समाजाला परवडतील अशा सोयी असलेल्या होत्या. त्या काळात चारचाकी गाडी ही मध्यमवर्गीय लोकांना परवडणारी नसल्याने या इमारतींना तळमजल्यावर पार्किंगची सोय नव्हती. पुढे तीस-पस्तीस वर्षानंतर, वाढलेले कुटुंब आणि त्यामुळे भासणारी जागेची कमतरता, काळानुसार बदललेल्या घरातील अंतर्गत सजावटीच्या गरजा, मूळ रहिवाशांच्या वाढलेल्या वयामुळे जिने चढ-उतार करायला होणारा त्रास आणि लिफ्टची कमतरता, नवीन चारचाकी आणि दुचाकी वाहने आल्यामुळे होणारी पार्किंगची गैरसोय, इमारतीचे वाढते वय आणि त्यातून होणाऱ्या दुरुस्त्या व देखभालीवरचा खर्च, जमीन, भिंत आणि छत यातून येणारा ओलावा, त्यामुळे होणारी गैरसोय या अशा अनेक कारणांमुळे या इमारती राहण्यासाठी गैरसोयीच्या होऊ लागल्या आणि या इमारतींच्या पुनर्विकासाची गरज भासू लागली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा