लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शहरातील आमदारांनी पुण्याच्या पाण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केले. शहराच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील पाणीपुरवठ्याचा प्रश्न असल्याची कबुली राज्य सरकारकडून देण्यात आली. मात्र या गावांना अस्वच्छ पाणीपुरवठा होत नसल्याचा दावाही करण्यात आला. तसेच शहराचा वाढता विस्तार आणि महापालिकेने केलेली वार्षिक २०.९० अब्ज घनफूट (टीएमसी) पाण्याची मागणी मान्य होणार का, असा प्रश्नही आमदारांकडून विचारण्यात आला.

cbse board exam 2025 question bank pdf subject wise for class 10 12 students download from cbse gov in
Question Bank For CBSE 10th 12th Exam 2025 : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट! १० दिवसांमध्ये ‘असा’ करा सराव
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
CET exam applications marathi news
सीईटीचे अर्ज भरण्यासाठी अजून एक संधी, दुसऱ्यांदा मुदतवाढ; पाच अभ्यासक्रमांचे अर्ज १० फेब्रुवारीपर्यंत भरता येणार
केंद्राशी समन्वय साधण्याचा प्रयत्न; कांजूरमार्ग कारशेड मालकीप्रकरणी राज्य सरकारचा न्यायालयात दावा
rules for RTE admissions Change, Committee Education Department
आरटीईच्या प्रवेशांसाठीच्या नियमांमध्ये होणार बदल… शिक्षण विभागाकडून समितीची स्थापना
10th exam, 12th exam, Maharashtra state board ,
राज्य मंडळाचा मोठा निर्णय… दहावी, बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार झाल्यास केंद्रांची मान्यता कायमस्वरुपी रद्द
financial news loksatta
राज्य उत्पन्नाच्या प्रभावी अंदाजासाठी माहितीची गतीमान देवाणघेवाण आवश्यक, राज्य उत्पन्न सल्लागार समितीच्या बैठकीचा सूर
waqf bill
‘वक्फ विधेयक’ आगामी अधिवेशनातच, येत्या दोन दिवसांत अहवालावर शिक्कामोर्तब

विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात आमदार काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी तारांकित प्रश्न विचारला होता. त्यावर समाविष्ट ३४ गावांतील पाणीटंचाईसह शहराच्या पाणी पुरवठ्याबाबत भाजप आमदार भीमराव तापकीर, काँग्रेस आमदार संग्राम थोपटे आणि संजय जगताप, तसेच अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला.

आणखी वाचा-पुणे: चित्रपटगृहात महिलेशी अश्लील वर्तन; तिघे अटकेत

महापालिकेत समाविष्ट झालेल्या ३४ गावांमध्ये पाण्याचा प्रश्न असल्याची कबुली मुख्यमंत्री यांच्या वतीने उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. मात्र अस्वच्छ पाणीपुरवठा होत नसून समाविष्ट गावांमधील पाणी समस्या सोडविण्यासाठी महापालिकेकडून सविस्तर प्रकल्प अहवाल (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट- डीपीआर) करण्याचे काम सुरू आहे, असे सामंत यांनी सांगितले.

शहरातील बहुचर्चित समान पाणीपुरवठा योजनेचे रखडलेले काम, टँकरमाफियांवरील नियंत्रण, पेठांमधील पाण्याच्या प्रश्नासंदर्भात आमदार रवींद्र धंगेकर यांनी विचारणा केली. शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता महापालिकेच्या प्रस्तावानुसार शहराला वार्षिक २१ अब्ज घनफूट एवढा पाणीसाठा मंजूर होणार का, असा प्रश्नही त्यांनी विधिमंडळात उपस्थित केला.

Story img Loader