इतरांची लग्नं लावणाऱ्या ‘गुरुजीं’ना लग्नासाठी मुली मिळत नाहीत हे वास्तव असले, तरी ते बदलू लागले आहे. पुण्यात गेल्याच आठवडय़ात खास गुरुजींसाठी भरविण्यात आलेल्या विवाह मेळाव्यानंतर त्यांच्यासाठी अनेक मुलींच्या पालकांकडून विचारणा होऊ लागली आहे. त्यामुळे गुरुजींसाठी काम करणारी संस्था आणि लग्न रखडलेल्या गुरुजींसाठी आशेचा किरण दिसू लागल्याचे वातावरण आहे.
मुलींच्या शिक्षणाचे वाढलेले प्रमाण, बदललेल्या संकल्पना यामुळे पौरोहित्य करणाऱ्यांचा लग्नाच्या बाजारातील भाव घटला आहे. त्यामुळे त्यांची लग्नं न जुळणे ही बऱ्याच वर्षांपासूनची समस्या आहे. पुण्यातील ‘श्री सद्गुरू ग्रुप’ या संस्थेतर्फे पौरोहित्य करणाऱ्या राज्यभरातील गुरुजींसाठी हा मेळावा आयोजित केला होता. त्यात राज्याच्या सर्व भागांतून तसेच, गोवा, बलसाड, बेळगाव या भागांतून विवाहेच्छुक गुरुजी आले होते. २२ ते ४८ वर्षे वयोगटातील एकूण सहाशेपेक्षा जास्त जण त्यात सहभागी झाले होते. त्यांच्याशी लग्नाला इच्छुक असणाऱ्या मुलींची संख्या केवळ ४२ इतकी होती. मात्र, मुलींचे पालक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. त्यांची संख्या १४० पेक्षा जास्त होती. आतापर्यंतचा अनुभव पाहता इतक्या पालकांचा सहभाग ही सकारात्मक बाब आहे. विशेष म्हणजे या मेळाव्यानंतर मुलींच्या पालकांकडून मोठय़ा प्रमाणात विचारणा होत आहे, अशी माहिती या मेळाव्याचे आयोजक आणि श्री सद्गुरू ग्रुप या संस्थेचे अध्यक्ष यशवंत कुलकर्णी यांनी दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा