पुणे : ‘जोपर्यंत आहे नरेंद्र मोदी आणि माझी जोडी, पुढे जाणार नाही राहुल गांधी यांची गाडी’ अशी कविता करत आमचे सरकार पाच वर्षं चालणार असल्याचा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला. राहुल गांधी आता थोडे हुशार झाले आहेत, अशी टिप्पणीही त्यांनी केली.

शिक्षण प्रसारक मंडळी, श्रमिक ब्रिगेड यांच्यातर्फे लेडी रमाबाई सभागृहात विद्यार्थी संवाद कार्यक्रमात आठवले बोलत होते. आठवले म्हणाले, लाेकसभा निवडणुकीदरम्यान भाजप सत्तेत आल्यावर संविधान बदलणार अशा चर्चेला उत आला हाेता. आम्हाला स्पष्ट बहुमत मिळाले असून पाच वर्षे सरकार चालणार आहे. विकास कामे हाेत आहेत. भारताची अर्थव्यवस्था तीन क्रमांकावर आणून गरीब माणसाला ताकद द्यायची आहे. त्यासाठी याेजना राबविणार आहे. गेल्या दहा वर्षांत २५ काेटी लाेकांना गरीबी रेषेच्या वर आणले आहे.

minister hasan mushrif
नितेश राणे यांच्या विधानाकडे देवेंद्र फडणवीस यांनी गांभीर्याने पाहावे, मंत्री हसन मुश्रीफ यांची मागणी
pandharinath kamble daughter grishma supports father and shared angry post on jahnavi killekar
बाबाच्या अपमानानंतर पंढरीनाथ कांबळेच्या लेकीची जान्हवीसाठी पोस्ट; म्हणाली, “त्यांच्या करिअरवर बोलण्याआधी…”
State President Chandrasekhar Bawankule defined the BJP workers and laid down the work formula
“भाजप कार्यकर्ता जिंकतो किंवा शिकतो, पराभूत होत नाही,” कोणी केली ही व्याख्या? वाचा…
Praful Patel, Maharashtra politics| Uddhav Thackeray| Praful Patel Criticizes uddhav thackeray|
“उद्धव ठाकरेंनी संयम बाळगावा…” प्रफुल पटेल यांचा सल्ला; म्हणाले, “ते वक्तव्य…’’
nana patole
सचिन वाझेंच्या आरोपानंतर नाना पटोले यांचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा; म्हणाले, “दोघेही म्हणत आहेत माझ्याकडे पुरावा आहे…”
devendra fadnavis and anil deshmukh share same stage but did not talk to each other
‘ते’ दोघे एकत्र आले, पण संवाद न साधताच निघून गेले…
bachchu kadu, Shyam Manav,
श्याम मानव यांनी राजकीय भाष्य केले असेल तर गैर काय – बच्चू कडू
Sharad Pawar dreams of becoming PM on seven seats says Sudhir Mungantiwar
“शरद पवार केवळ सात जागांच्या भरोशावर पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहताहेत,” सुधीर मुनगंटीवार यांची टीका

हेही वाचा – शहरबात : आरोग्य यंत्रणांमध्ये सुस्तावलेपणाची साथ

हेही वाचा – आयएएस पूजा खेडकर प्रकरणावर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचे विधान; म्हणाले, “दोषी आढळल्यास त्यांना…”

युवतींना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न आहे. मुलांपेक्षा मुली हुशार असतात हे विविध परीक्षांच्या निकालांतून दिसते. महिला अत्याचार रोखण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. अत्याचार करणाऱ्यांची राक्षसी मनोवृत्ती संपवण्यासाठी समाजाने पुढे आले पाहिजे. प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे, असेही आठवले म्हणाले.