पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीत राहुल कलाटे यांनी आपली अपक्ष उमेदवारी मागे घ्यावी म्हणून शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्तिगत फोन केले. मात्र, कलाटेंनी या दोन्ही नेत्यांची विनंती नाकारत अपक्ष लढण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. त्यामुळे महाविकासआघाडीला धक्का बसला आहे. या निर्णयाच्या घोषणेनंतर राहुल कलाटेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. ते शुक्रवारी (१० फेब्रुवारी) पुण्यात माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.

राहुल कलाटे म्हणाले, “चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. उद्धव ठाकरे, अजित पवार आणि विविध पक्षातील काही नेते ज्यांनी मला माघार घेण्याबाबत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष भेटले त्यांच्याविषयी मी आदर व्यक्त करतो. परंतु, चिंचवडच्या जनतेला ही कुस्ती कधीच आवडली नसती. त्यामुळेच चिंचवडच्या जनतेतून मला प्रचंड मोठ्या प्रमाणात रेटा होता की, मी लढलं पाहिजे.”

Amit Thackeray on Ajit Pawar
Amit Thackeray: ‘स्वतःच्या मुलाला निवडून आणता आलं नाही’, अजित पवारांच्या टीकेला अमित ठाकरेंचं प्रत्युत्तर; म्हणाले, “हरलो तरी..”
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Devendra Fadnavis to Inaugurate TJD Deccan Summit 2025
ठाकरे, पवारांचे आधीच ठरले होते, मुख्यमंत्री फडणवीस यांचे मोठे वक्तव्य !
Why Shiv Sena Thackeray group leaders are not stopping their party defection
ठाकरे गटातील गळती का थांबत नाही ?
K T Rama Rao On Delhi Election Result
Delhi Election Result : ‘विजय भाजपाचा, पण अभिनंदन राहुल गांधींचं…’; BRS च्या कार्याध्यक्षांची दिल्लीच्या निकालावर खोचक प्रतिक्रिया!
Image Of Ajit Pawa
“महायुतीच्या बातम्या नीट द्या नाहीतर…”, हातात AK47 घेत अजित पवारांची मिश्किल टिप्पणी
Priyanka Gandhi On Narendra Modi
Priyanka Gandhi : “असे रडणारे नेते कधीही पाहिले नाहीत”, प्रियांका गांधींचं पंतप्रधान मोदी, केजरीवालांना जोरदार प्रत्युत्तर
Uddhav Thackeray, Ahilyanagar, existence,
अहिल्यानगरमध्ये ठाकरे गटाला गळती, अस्तित्वाचा प्रश्न

“१ लाख १२ हजार जनतेचं त्यांचं शेवटचं मत राहुल कलाटेला दिलं होतं”

“याच १ लाख १२ हजार जनतेचं शेवटचं मत राहुल कलाटेला दिलं होतं. त्यावेळी संपूर्ण देशात भाजपाची लाट होती. दिवंगत आमदारांचा या भागातील लोकांवर प्रचंड दबाव होता. महापालिका, राज्य आणि देशातही भाजपाची सत्ता होती. असं असताना इतक्या लोकांनी मला मतदान केलं. याच लोकांचा आज मला निवडणूक लढण्यासाठी आग्रह होता,” असं राहुल कलाटे यांनी सांगितलं.

हेही वाचा : “राहुल कलाटेला कुणाची फूस? याबाबत माहिती घेऊ” असे सांगताना अजित पवारांनी पत्रकारांना दिली तंबी

“तू नेत्यांचं ऐकत असताना आमचा अनादर करू नको”

“प्रत्येकाचं एकच मत होतं की, राहुल तू लढलं पाहिजे. तू नेत्यांचं ऐकत असताना आमचा अनादर करू नको. त्यामुळे चिंचवडच्या जनतेचा आदर करणं मला क्रमप्राप्त होतं. ही लोकभावना आणि पाठिंबा याच्या बळावर मी निवडणुकीला सामोरं जात आहे,” असंही राहुल कलाटेंनी नमूद केलं.

Story img Loader