पुणे : मध्य रेल्वेने उन्हाळी सुट्यांच्या पार्श्वभूमीवर कोकणासाठी विशेष गाड्या सोडण्यास सुरूवात केली आहे. रेल्वेकडून पुणे-रत्नागिरी आणि पनवेल-रत्नागिरी या साप्ताहिक गाड्या सोडण्यात येत आहेत.

उन्हाळी सुट्यांमुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. यामुळे कोकणात जाणाऱ्या गाड्यांना गर्दीही वाढली आहे. रेल्वेने ही गर्दी कमी करण्यासाठी विशेष गाड्या सोडण्यास सुरूवात केली आहे. पुणे आणि पनवेलमधून रत्नागिरीसाठी या साप्ताहिक विशेष गाड्या सोडल्या जाणार आहेत. एकूण १६ गाड्या सोडण्यात येणार असून, त्या अनारक्षित असणार आहेत.

south east central railway cancels regular passenger train for two days releasing special kumbh mela train
कुंभमेळाच्या विशेष गाडीसाठी दोन दिवस पॅसेंजर गाडीला ब्रेक
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Hyundai launched exter with upgraded high tech features with lowest price Hyundai cheap car
टाटाची उडाली झोप! ह्युंदाईने बाजारात आणली सर्वात स्वस्त SUV; अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह मिळणार दमदार इंजिन, किंमत फक्त…
shreehari balaji maharaj devasthan in chimur and horse chariot procession attract devotees in vidarbha
क्रांतिभूमी चिमूरमध्ये दरवर्षी भरते घोडा यात्रा, ३९७ वर्षाची परंपरा
tips will not reduce the summer mileage
‘या’ टिप्स फॉलो केल्यास उन्हाळ्यात कमी होणार नाही तुमच्या कारचे मायलेज
Tata punch ev discount upto 70000 rupees in february due to stock clear tata offer
टाटाने केलं मार्केट जाम! ‘या’ इलेक्ट्रिक कारवर तब्बल ७०,००० हजारांची सूट; किंमत आणि फिचर्स घ्या जाणून…
mandatory to install High Security Number Plates HSRP on vehicles pune
जुन्या वाहनांना ‘उच्च सुरक्षा क्रमांक पाटी’ लावा! अन्यथा दंडात्मक कारवाई
22.91 lakh vehicles sold in January says FADA report
जानेवारीमध्ये २२.९१ लाख वाहनांची विक्री – फाडा

हेही वाचा >>>‘डीआरडीओ’ संचालकाची परदेशात पाकिस्तानी हेरांशी भेट; ‘एटीएस’च्या तपासातील माहिती

पुणे-रत्नागिरी ही गाडी ४ मे ते २५ मे या कालावधीत सोडली जाणार आहे. ही गाडी दर गुरूवारी पुण्यातून रात्री ८ वाजून ५० मिनिटांनी रवाना होईल. ती रत्नागिरीत शुक्रवारी सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी पोहोचेल. ही गाडी दर शनिवारी दुपारी १ वाजता रत्नागिरीतून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ११ वाजून ५५ मिनिटांनी पुण्यात पोहोचेल. या गाडीला लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरवली रस्ता आणि संगमेश्वर रस्ता हे थांबे आहेत.

हेही वाचा >>>‘डीआरडीओ’ संचालकाची परदेशात पाकिस्तानी हेरांशी भेट; ‘एटीएस’च्या तपासातील माहिती

पनवेल-रत्नागिरी ही गाडी ५ ते २६ मे या कालावधीत सोडली जाणार आहे. ही गाडी दर शुक्रवारी रात्री ९ वाजून ३० मिनिटांनी पनवेलहून सुटेल. ती रत्नागिरीला शनिवारी पहाटे ४ वाजून ३० मिनिटांनी पोहोचेल. रत्नागिरीहून ही गाडी शुक्रवारी दुपारी १ वाजता सुटून त्याच दिवशी रात्री १० वाजून ३० मिनिटांनी पनवेलला पोहोचेल. या गाडीला रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरवली रस्ता आणि संगमेश्वर रस्ता हे थांबे आहेत.

Story img Loader