लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: व्यवस्थापनशास्त्र पदव्युत्तर पदवी (एमबीए) अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेली प्रवेश परीक्षा तांत्रिक कारणांमुळे काही विद्यार्थ्यांना देता आली नव्हती. विद्यार्थ्यांच्या तक्रारींनंतर राज्य सीईटी सेलने स्थापन केलेल्या चौकशी समितीच्या अहवालानुसार एमबीए सीईटी पुन्हा घेण्याचा निर्णय झाला असून, आता २७ एप्रिलला रोजी होणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना ११ एप्रिलपर्यंत अर्ज करता येईल.

प्रवेशाची पायरी : ‘आयआयटी’मध्ये ‘डिझाइन’ पदवी सीईटी
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
Nagpur High Court , academic loss, student,
विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी न्यायालयाने नियमांपलिकडे…
High Court relief to law student sentenced to year community service for misconduct
अमर्याद काळासाठी विद्यार्थ्याची हकालपट्टी म्हणजे त्याच्या शैक्षणिक कारकीर्दीचा मृत्यूच
Clashes erupted between supporters of BJP leader Munna Yadav and his relative Balu Yadav
धक्कादायक! दहावीच्या विद्यार्थ्याकडून शिक्षिकेला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न; आधी आंघोळीचा व्हिडीओ बनवला नंतर…
girls admission vocational courses, girls Maharashtra admission,
राज्यातील १ लाख ३९ हजार मुलींनी घेतला व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश, ‘या’ अभ्यासक्रमांना सर्वाधिक पसंती
walchand college of engineering
वालचंद महाविद्यालय बळकाविण्यासाठी अडवणुकीचे सत्र
no decision from maha government on mahajyoti withdraw from uniform policy process
‘समान धोरण’मुळे लाखो विद्यार्थी वंचित; ‘महाज्योती’ बाहेर पडल्यानंतर सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा

राज्य सीईटी सेलतर्फे एमबीए या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची सीईटी २५ आणि २६ मार्चला राज्यभरातील १९१ ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. मात्र पहिल्याच दिवशी तांत्रिक कारणामुळे काही विद्यार्थ्यांना सीईटी देता आले नाही. काही ठिकाणी सर्व्हरच्या तांत्रिक अडचणी उद्भवल्या होत्या. हा प्रकार समोर आल्यावर राज्य सीईटी सेलच्या नियोजनाबाबत विद्यार्थी-पालकांनी संतप्त भावना व्यक्‍त केल्या होत्या. तसेच एमबीएची सीईटी पुन्हा घेण्याची मागणी जोर धरू लागली होती.

आणखी वाचा- पुणे: सीईटी सेलच्या ‘या’ निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दिलासा

विद्यार्थ्यांच्या तक्रारींची नंतर राज्य सीईटी सेलने चौकशी समिती स्थापन केली होती. परीक्षेबाबतच्या सर्व तक्रारींची शहानिशा करून चौकशी समितीने दिलेल्या अहवालानुसार एमबीएची पुन्हा एकदा सीईटी घेण्याचा निर्णय झाला. तांत्रिक कारणामुळे सीईटी देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संबंधित विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षेच्या अर्जांसाठी ११ एप्रिल ही अंतिम मुदत आहे. तर परीक्षा २७ एप्रिलला सकाळी नऊ ते साडेअकरा या वेळेत होईल, असे सीईटी सेलने स्पष्ट केले आहे. तांत्रिक अडचणींमुळे परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षेच्या या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे.