पुणे : गेल्या चार – पाच दिवसांपासून मुंबईसह किनारपट्टीवर आणि विदर्भात असलेला पावसाचा जोर काहीसा कमी होणार आहे. त्यामुळे पूरजन्य स्थितीचा सामना करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ओडिशाच्या किनारपट्टीवर असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी झाली असून, ते ओडिशा आणि लगतच्या छत्तीसगडवर आहे. गुजरातच्या किनारपट्टीपासून केरळच्या किनारपट्टीपर्यंत असलेला कमी दाबाचा पट्टा कायम आहे. दक्षिणेकडे झुकलेला मोसमी पावसाचा आस पुन्हा उत्तरेकडे गेला आहे. प्रामुख्याने मोसमी पावसाचा (मान्सून ट्रफ) आस उत्तरेकडे सरकल्यामुळे आणि बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी झाल्यामुळे पुढील चार दिवस विदर्भात पावसाचा जोर कमी राहणार आहे.

What is the water storage in the Khadwasla dam chain Pune news
खडवासला धरण साखळीत पाणीसाठा किती? पुण्याचा पाणीपुरवठा सुरळीत राहणार?
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
nashik jaljeevan mission aims to provide 55 liters of clean water daily
पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या जळगाव जिल्ह्यातच ‘जलजीवन मिशन’ संकटात, चार वर्षात केवळ २९४ योजना पूर्ण
592 crores assistance to those affected by natural disasters
नैसर्गिक आपत्ती बाधितांना ५९२ कोटींची मदत, राज्यातील ५.४० लाख शेतकऱ्यांना दिलासा
maharashtra cabinet approves rs 315 5 crore for repair leaks in temghar dam
टेमघर धरणाची गळती थांबणार;  जाणून घ्या, गळती रोखण्यासाठी किती कोटींची तरतूद
Maharashtra Kesari 2025
Maharashtra Kesari 2025 : पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ ठरला यंदाचा महाराष्ट्र केसरी; सोलापूरचा महेंद्र गायकवाड पराभूत
India Climate Change Inflation Agriculture Farmers
व्यवसायाभिमुख पिके हवीत!
Panvel municipal corporation Inaugurates development works Chief Minister devendra fadnavis
पनवेलमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विकासकामांचे लोकार्पण

हेही वाचा – उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे नेते… अमित शाहांची टीका

गुजरातमधील कच्छ परिसरावर वाऱ्याची चक्रीय स्थिती तयार झाल्यामुळे रविवारी ठाणे, पालघर, मुंबईत मुसळधार पाऊस पडला. रविवारी सायंकाळपासून कच्छमधील वाऱ्याची चक्रीय गती कमी होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सोमवारी दुपारनंतर मुंबईसह ठाणे, पालघरमध्ये पावसाची तीव्रता कमी होण्याचा अंदाज आहे.

मुंबई, कोकण, विदर्भाला झोडपले

रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता संपलेल्या नऊ तासांत सातांक्रुजमध्ये १४० मिमी, कुलाब्यात ४० मिमी, डहाणूत १३८ मिमी, रत्नागिरीत ६२ मिमी आणि महाबळेश्वरमध्ये १४१ मिमी, पावसाची नोंद झाली आहे. तर रविवारी सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या २४ तासांत दापोलीत २४० मिमी, मंडणगडमध्ये २४० मिमी, नागपूर विमानतळावर १६० मिमी, गडचिरोलीत १६८.६ मिमी, नागपूर १६४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

हेही वाचा – पुणे: रिक्षांसह इतर तक्रारींसाठी आरटीओने हेल्पलाइन सुरू केली पण उत्साही नागरिकांमुळे वाढली डोकेदुखी…

सोमवारसाठी इशारा

नारंगी इशारा – रायगड, रत्नागिरी, सातारा, भंडारा.

पिवळा इशारा – सिंधुदुर्ग, कोल्हापूर, पुणे, मुंबई, ठाणे, पालघर आणि विदर्भ.

Story img Loader