पुणे : नैर्ऋत्य मोसमी पाऊस आठवडय़ाच्या कालावधीत राज्यातून निघून जाण्याची शक्यता असतानाच त्यापूर्वी होत असलेल्या पावसाने राज्याच्या विविध भागांत अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. शेतीमालाचेही त्याने मोठे नुकसान केले आहे. मोसमी पावसाच्या चार महिन्यांच्या हंगामात ३० सप्टेंबपर्यंत राज्यात सरासरीच्या तुलनेत २४ टक्के अधिक पाऊस झाला होता. हंगामात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाची पावसात आघाडी होती. कोकणसह मुंबई परिसरात मात्र नेहमीच्या तुलनेत कमी पाऊस झाला होता. हंगामानंतरचा आणि परतीचे वेध लागलेल्या पावसाने मात्र हे चित्र काही प्रमाणात बदलून टाकले आहे. २० सप्टेंबरपासून राजस्थानमधून मोसमी पावसाने परतीचा प्रवास सुरू केला असला, तरी त्याचा प्रवास विलंबाने होतो आहे. या कालावधीत बंगालचा उपसागर, दक्षिणेकडील राज्ये, अरबी समुद्र आदी ठिकाणाहून कमी दाबाचे पट्टे आणि वाऱ्यांची चक्रिय स्थिती निर्माण झाली. यासह स्थानिक परिस्थितीही राज्यातील पावासाला कारणीभूत ठरली. त्यातून गेल्या १२ दिवसांमध्ये राज्यात विविध भागांत मोठय़ा प्रमाणावर पाऊस झाला. काही भागांत अतिवृष्टीची स्थिती निर्माण झाल्याने काढणीला आलेल्या आणि काढणी झालेल्या पिकांनाही मोठा फटका बसला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा