इंदापूर :
तू नभातले तारे, माळलेस का तेव्हा?
माझियाच स्वप्नांना गाळलेस का तेव्हा?
आज का तुला माझे एवढे रडू आले?
तू, चितेवरी अश्रू ढाळलेस का तेव्हा?

कवी, गझलकार सुरेश भटांच्या गझलेतील प्रेमिकांच्या या भावना प्रेमवीर विविध प्रकारे व्यक्त करतात. व्हॅलेंटाईन डे चा आधार प्रेमवीरांना नेहमीच लाभतो. प्रेम वेगवेगळ्या भावनांनी व्यक्त होत असले तरी,त्याला गुलाबाचे फुल ही भावना अधिक उत्कट करतो. हवाहवासा वाटणारा हा काटेरी ‘गुलाब’ इंदापूर तालुक्यातील कळस सारख्या पाणीटंचाई असलेल्या भागांमध्ये माळरानावर फुलला आहे.

AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना; कारण काय?
Wax gourd cabbage onion
कांदा,कोबी आणि कोहळा हे त्रिकुट तुम्हाला कसं निरोगी…
Prashant Kishor on AAP loss In Delhi Election result 2025
Prashant Kishor on AAP loss : दिल्ली निवडणुकीत केजरीवालांच्या ‘आप’चा पराभव का झाला? राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी सांगितली कारणे
loksatta editorial on arvind kejriwal
अग्रलेख : ‘आप’ले मरण पाहिले…
mahakumbh traffic update
Mahakumbh Traffic: “जगातलं सर्वात मोठं ट्रॅफिक जाम”, प्रयागराजकडे जाणाऱ्या रस्त्यांवर अभूतपूर्व वाहतूक कोंडी, भाविक तासनतास खोळंबले!
infosys mass lay off marathi news
“Infosys एक भयानक पद्धत रूढ करत आहे”, मोठ्या कर्मचारी कपातीवर NITES ची केंद्र सरकारकडे तक्रार!
Pune RFD Project Chipko River March Latest News
Pune RFD Project : पुण्यातील नद्यांसाठी अभिनेते सयाजी शिंदे मैदानात, RFD प्रकल्पाविरोधात बाणेरमध्ये शेकडो लोक रस्त्यावर
ranveer allahbadia on indias got latent video
स्पर्धकाच्या आई-वडिलांच्या प्रायव्हसीवर अश्लील वक्तव्य; रणवीर अलाहाबादियावर लोकांचा संताप, म्हणाले, “विकृत…”

निसर्गाच्या लहरीपणामुळे परंपरागत शेतीला फाटा देत कळस ता. इंदापूर येथील सुमारे २५ शेतकऱ्यांनी आपल्या क्षेत्रात गुलाबाची लागवड केली आहे. त्यांनी श्रमातून फुलवलेल्या गुलाब शेतीचा सुगंध आता चांगलाच दरवळत आहे. येथील शेतकऱ्यांनी या आठवड्यात सुमारे ५० हजार फुलांची  विक्री केली आहे. व्हेलेडाईन डे मुळे दरात दुप्पट वाढ झाल्याने या फुलांनी जास्तच भाव खाल्ला आहे. यामुळे गुलाब उत्पादकांची कळी खुलली आहे.

व्हेलेडाईन डे ला न बोलता, फक्त फुलांमधून तुमच्या भावना व्यक्त करण्याचा हा एक अनोखा मार्ग प्रेमिक अवलंबितात. यामुळे गुलाबाच्या फुलांना मागणी वाढली आहे. खडकवासला धरणाच्या पाण्यावर बहुतांशी क्षेत्र अवलंबून असलेल्या कळस गावात ही गुलाबाची शेती फुलली आहे. एकीकडे शेतीची पोत कमी होत आहे. त्यातच निसर्गाचा माराही सहन करावा लागतो. परंपरागत शेतीने अनेक शेतकरी संकटात सापडले. मात्र, येथील शेतकऱ्यांनी गुलाबाच्या टोचणार्या काट्याची तमा न बाळगता आपल्या श्रमातून गुलाबाची शेती फुलविली आहे.  

बाजारपेठेचा उत्तम अभ्यास, विक्रीचे कुशल तंत्र आणि त्यासाठी लागवडीचे चोख व्यवस्थापन यातून त्यांनी दर्जेदार गुलाबाची बागच नव्हे, तर त्यातून यश देखील फुलवले आहे. गुलाबाची शेती किमान सहा वर्षे टिकत असल्याने जमिनीची चांगली मशागत करावी लागते. या परिसरात ग्लॅडिएटर या जातीचे उत्पादन जास्त घेतले जाते. ग्लॅडिएटर फूल गडद लाल रंगाचे असते दांडा मोठा असतो. हे फूल खपाला चांगला प्रतिसाद देते चांगल्या फुटी येतात. त्यामुळे या गुलाबांची निवड केली जाते.

सध्या फुलशेती महत्त्वाची व किफायतशीर ठरत आहे यामध्ये गुलाबशेती हा महत्त्वाचा उद्योग होऊ शकतो. सर्व फुलांमध्ये गुलाबास वरचे स्थान आहे  गुलाबास ‘फुलांचा राजा’ म्हटले जाते. अत्तरे, सुगंधी तेल,गुलकंद यासारखी मौल्यवान उत्पादने गुलाबापासून मिळतात. गुलकंद आरोग्यवर्धक मानले जाते. गुलाबाची फुले केशशृंगार, पुष्प सजावट, फुलदाणी सजावट, हार, गुच्छ बनविण्यासाठी वापरली जातात. आजारी माणसाला लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा देताना गुलाबाची फुले दिली जातात. याशिवाय भावना व्यक्त करण्यासाठी या फुलाचा वापर केला जातो.

गुलाबाचा दर आकर्षक रंग, आणि गुणवत्तेवर ठरतो. बाजारपेठेत गुलाबाला वर्षभर विशेषतः गणपती, नवरात्र,दिवाळी, शिक्षक दिन, लग्नसराई मोठी मागणी असते. मात्र, तो सर्वाधिक भाव खातो तो व्हॅलेंटाईन दिनी. यावेळी मागणीही चांगली आणि दरही चांगला मिळतो. सरासरी दोन रुपयाला एक फूल विकले गेले. तर नफा चांगला राहतो मात्र व्हेलेडाईन डे ला चार रुपये बाजारभाव मिळतो.

Story img Loader