पुणे : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठीची सोडत शुक्रवारी काढण्यात आली. मात्र न्यायालयीन प्रकरणामुळे विद्यार्थ्यांची निवड यादी १२ जूननंतर जाहीर करण्यात येणार आहे. 

शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, प्राथमिक शिक्षण संचालक, माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत आरटीई प्रवेशांची सोडत विद्यार्थ्यांच्या हस्ते काढण्यात आली. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला.  प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे शैक्षणिक वर्ष २०२४-२५साठी आरटीईअंतर्गत प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे.  राज्यातील  ९ हजार २०८ शाळांमध्ये १ लाख ८ हजार २१६ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी २ लाख ४३ हजार १०४ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल या शाळेत प्रवेशासाठी सर्वाधिक २ हजार २१७ अर्ज आले आहेत.

no decision from maha government on mahajyoti withdraw from uniform policy process
‘समान धोरण’मुळे लाखो विद्यार्थी वंचित; ‘महाज्योती’ बाहेर पडल्यानंतर सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
2019 scholarship scheme helps meritorious students from marginalized groups study abroad
उपमुख्यमंत्री फडणवीसांनी बैठक घेताच ओबीसी समाजातील ७५ विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्ती मंजूर
RTO Maharashtra, RTO employees, RTO Nagpur,
राज्यभरातील ‘आरटीओ’चे कामकाज ठप्प, संपकर्ते कर्मचारी म्हणतात…
Non-Creamy Layer, income proof OBC, OBC,
ओबीसींसाठी उत्पन्नाच्या दाखल्याची अट रद्द, शासन निर्णय काय सांगतो?
Loksatta pahili baju What is the next step of Ayushman Bharat Pradhan Mantri Jan Arogya Yojana
पहिली बाजू: आयुष्मान भारत : सर्वसमावेशक सेवेसाठी!
Extension of 15 days for students to submit SEBC and Non Criminal Certificate
एसईबीसी व नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांना १५ दिवसांची मुदतवाढ
15 days deadline for installation of CCTV in Government Ashram Schools of Tribal Development Department nashik
आश्रमशाळांना सीसीटीव्हीसाठी १५ दिवसांची मुदत; आदिवासी विकास विभागाचा निर्णय

हेही वाचा >>>राज्यात पुढील पाच दिवस पावसाचे; मुंबईत अतिवृष्टीचा इशारा

 सोडतीनुसार निवड होणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी न्यायालयाचा आदेश आल्यास १२ जूननंतर प्रसिद्ध होईल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना लघुसंदेश प्राप्त होईल. त्यानंतर तालुकास्तरावर समितीकडून कागदपत्र पडताळणी होऊन प्रवेश निश्चित होतील, अशी माहिती गोसावी यांनी दिली.