पुणे: मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यामध्ये १७ दिवस उपोषण केलं. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मराठा आरक्षणाविषयी आश्वासनानंतर हे उपोषण मागे घेतलं. असं असताना शिंदे- फडणवीस सरकारमधील मंत्री आणि नेते मराठा समाजाला आरक्षण देण्यासंबंधी विसंगती असल्याचं शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सचिन आहिर यांनी म्हटलं आहे. एकीकडं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मराठा समाजाला आरक्षण देऊ असं आश्वासन देत आहेत. तर दुसरीकडे नारायण राणे हे मात्र मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देऊ नयेत असं म्हणत आहेत. सचिन आहिर पिंपरी- चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

आणखी वाचा-भाजप नेत्यांच्या उपस्थितीत संघ परिवाराचे विचारमंथन

Ajit Pawar retirement jibe at uncle Sharad Pawar,
पिंपरी : वडिलधाऱ्यांनी वयाच्या सत्तरीनंतर मुलांकडे जबाबदारी दिली पाहिजे; अजित पवार यांचा शरद पवार यांच्यावर निशाणा
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Devendra Fadnavis Statement about Teli Samaj Wardha
वर्धा: देवेंद्र फडणवीस म्हणतात, ’तेली समाज माझा पाठीराखा म्हणून मी पण…
Sharad Pawars big statement about increasing oppression of women
महिलांवरील वाढत्या अत्याचाराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…
Justice Sirpurkar, Hyderabad encounter,
हैदराबाद एन्काउंटरची चौकशी करणारे न्यायमूर्ती म्हणाले, “जलद न्यायाच्या मागे लागू नका…”
supriya sule on balasaheb thorat cm post statement
Supriya Sule : “राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल”, बाळासाहेब थोरातांच्या विधानावर सुप्रिया सुळेंची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाल्या…
Arvind Kejriwal resign today
केजरीवाल यांचा आज राजीनामा? राज्यपालांकडे भेटीसाठी वेळ मागितली
Sanjay Rathod in Digras Assembly Constituency Vidhan Sabha Nivadnuk 2024
कारण राजकारण: दिग्रसमध्ये राठोड यांचा प्रचार भाजप करणार? ‘मविआ’कडून कोणाला उमदेवारी?

भाजपामधीलच नारायण राणे हे मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देऊ नयेत असं म्हणतायेत यावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सचिन अहिर म्हणाले, मुख्यमंत्री त्या ठिकाणी जाऊन आश्वासन देतायेत की एक महिन्यात आपण मराठा आरक्षणाविषयी निर्णय घेऊ. तर कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ हे म्हणतायेत की मराठा समाजाला आरक्षण देण्याचा आपल्याला अधिकार नाही. त्यामुळे सरकारमध्येच मराठा आरक्षण देण्याविषयी विसंगती आहे. याचा अर्थ असा आहे की यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही. दोन्ही बाजूला पाठिंबा द्यायचा. दोघांना कळून चुकलं आहे, की हे सरकार आपली दिशाभूल करत आहे. असं सचिन आहिर म्हणाले आहेत.