पुणे : प्रसिद्ध बालसाहित्यकार आणि कवयित्री डॉ. संगीता बर्वे यांच्या ‘पियूची वही’ या पुस्तकास साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे.साहित्य अकादमीच्या वतीने बाल साहित्य पुरस्कारांची बुधवारी घोषणा करण्यात आली. देशातील २२ भाषांमधील बालसाहित्यकारांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यामध्ये मराठी भाषेसाठी डॉ. संगीता बर्वे यांच्या ‘पियूची वही’ या साहित्यकृतीला हा बहुमान प्राप्त झाला आहे.

महाराष्ट्र संतांची भूमी, जगद्गुरु तुकाराम महाराज सर्वांसाठी प्रेरणास्त्रोत- राज्यपाल कोश्यारी

Indian-Origin Chandrika Tandon Wins Grammys 2025
चंद्रिका टंडनला ग्रॅमी पुरस्कार; ‘त्रिवेणी’ अल्बमसाठी भारतीय वंशाच्या अमेरिकी संगीतकाराचा सन्मान
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Loksatta varshvedh magazine release by chief minister devendra fadnavis
‘वर्षवेध’ मध्ये २०२४ चा परिपूर्ण माहितीकोश; अंक लवकरच भेटीला, मुख्यमंत्र्यांच्या हस्तेप्रकाशन
Akshata and sudha Murthy in Jaipur Literature Festival
जयपूर साहित्य महोत्सव : संवाद हाच पालक आणि मुलांमधला महत्त्वाचा दुवा – अक्षता मूर्ती
loksatta tejankit Glory to the intelligent youth who implement innovations Mumbai print news
नवसंकल्पना राबविणाऱ्या प्रज्ञाशाली तरुणांचा गौरव
AMITAV GHOSH indian writer
बुकमार्क : दैत्य ओळखता आले पाहिजेत…
For one year EWS certificates not in prescribed format will be accepted as special case
ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र सादर न केलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा, विशेष बाब म्हणून प्रवेश ग्राह्य धरण्याच्या सूचना
Gantapaswini Mogubai Kurdikar Award announced to Singer Guru Meera Panashikar Pune news
गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर पुरस्कार गायिका-गुरु मीरा पणशीकर यांना जाहीर

साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाल्याचा आनंद आहे, अशी भावना डॉ.संगीता बर्वे यांनी व्यक्त केली. मुलांनी दैनंदिनी लिहावी या उद्देशाने ‘पियूची वही’ हे पुस्तक लिहिले. या पुस्तकामुळे अनेक मुलांनी दैनंदिनी लिहिण्यास सुरूवात केली आहे. त्याचाही मोठा आनंद आहे. या पुरस्कारामुळे हे पुस्तक आणखी मुलांपर्यंत पोहोचेल आणि ते वाचून मुले रोजचा दिनक्रम लिहिण्यास सुरूवात करतील. मुलांनी लिहिते व्हावे हाच या पुस्तक निर्मितीमागचा असलेला हेतू साध्य झाला आहे. मुले मोठ्या संख्येने लिहिते होत आहेत याचा मनस्वी आनंद आहे, असे बर्वे यांनी सांगितले.

Story img Loader