संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा अवघ्या तीन दिवसावर येऊन ठेपला आहे. त्यापूर्वी आळंदी देवस्थानकडून काही निर्णय घेण्यात आले आहेत. प्रस्थानावेळी मुख्य मंदिरात गर्दी आणि चेंगराचेंगरी टाळण्यासाठी दिंडीतील ७५ वारकऱ्यांनाच आत घेण्याचं देवस्थाने ठरवलं आहे. तशी विनंती दिंडी मालकांना, फडकऱ्यांना आळंदी देवस्थानचे विश्वस्त योगेश देसाई यांनी केली आहे.

माऊलींच्या पालखीच दुपारी चारच्या सुमारास प्रस्थान आहे. ते वेळेत व्हावं आणि शांततेत पार पडावं यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी म्हटल आहे. गेल्यावर्षी प्रस्तावनावेळी मंदिरात १७ हजार वारकरी दाखल झाले होते. त्यामुळे मोठी गर्दी झाली होती, असे देखील त्यांनी म्हटले आहे. आषाढी वारी निमित्त लाखो वारकरी आळंदीत दाखल होत आहेत. तीन दिवसांवरती माऊलींचा पालखी सोहळा येऊन ठेपला आहे. यावर्षी दिंडीतील वारकऱ्यांवर मर्यादा घालण्यात आली आहे.

Namdev Shastri Maharaj kirtan on Bhandara mountain postponed
पिंपरी : नामदेव महाराज शास्त्री यांचे भंडारा डोंगरावरील कीर्तन रद्द
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Amrut Snan on Vasant Panchami
Mahakumbh Mela 2025 : मौनी अमावस्येच्या चेंगराचेंगरीनंतर वसंत पंचमीसाठी उत्तर प्रदेश सरकारची चोख व्यवस्था; ‘एवढ्या’ कोटी भाविकांचं अमृतस्नान!
Ten citizens of Bondgaon have gone bald to show sympathy towards patients of village who suffering from hairloss
मनोबल वाढविण्यासाठी सामूहिक मुंडन!
BJP boycotts visit of Buldhana Guardian Minister and Rehabilitation Minister Makarand Patil
बुलढाणा : पालकमंत्र्यांच्या दौऱ्यावर भाजपचा बहिष्कार! युतीत विसंवाद
Mohan Hirabai Hiralal passed away recently in Nagpur
एका चळवळीची अखेर!
people , Vidarbha , Republic Day celebrations,
गणराज्य दिन संचलनाचे विदर्भातील ५१ जण होणार साक्षीदार
Abhijeet Adsul , Shivsena , Amravati, Ravi Rana ,
“महायुतीत तोंड दाबून बुक्क्यांचा मार..”, अभिजीत अडसूळ यांची राणा दाम्पत्यावर टीका

हेही वाचा >>> सखाराम महाराज संस्थान पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; १३६ वर्षांची परंपरा

दिंडीतील केवळ ७५ च वारकऱ्यांना आत घेऊन जाण्याचं आवाहन आळंदी देवस्थान कडून करण्यात आल आहे. दरवर्षी प्रस्तावनावेळी मोठी गर्दी होते. मुळात मंदिरात ४ हजार ४८० लोक थांबतील एवढीच जागा आहे, तसा अहवाल आळंदी देवस्थान यांच्याकडे आहे. परंतु, गेल्या वर्षी प्रस्तावनावेळी १६ ते १७ वारकरी उपस्थित होते. त्यामुळे मोठी गर्दी झाली होती. गर्दीमुळे चेंगराचेंगरी होऊ शकते यासाठी यावर्षी दिंडीतील केवळ ७५ वारकऱ्यांनाच आत मध्ये प्रवेश देणार असल्याचे देवस्थानकडून सांगण्यात आले आहे. माऊलींच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होताच नगर प्रदीक्षासाठी उर्वरित वारकरी आपापल्या दिंडीमध्ये सहभागी होऊन मंदिरात येऊ शकतात. अस विश्वस्त योगेश देसाई यांनी सांगितले आहे.

प्रस्थानावेळी मंदिरात ४७ प्रमुख दिंड्या असतात..

माऊलींच्या पालखीच्या प्रस्तावनावेळी दरवर्षी ४७ प्रमुख दिंड्या मंदिरात असतात. टाळ मृदुंगाच्या गजरात ते माऊलींच्या प्रस्थानात सहभागी होतात. परंतु, यावर्षी ४७ दिंड्यातील प्रत्येक दिंडी मधील केवळ ७५ जणांनाच आत येण्यासाठी परवानगी असेल. यामुळे मंदिरातील गर्दी आटोक्यात येऊन प्रस्थान वेळेवर होईल असं सांगण्यात येत आहे.

Story img Loader