आयुष्यात येणाऱ्या वेगवेगळ्या वळणांना सामोरे जाताना, आपल्या कुटुंबाला मानसिक, भावनिक, आर्थिक आधार देत वाटचाल करीत असताना उपलब्ध वेळेचे सुयोग्य नियोजन व्हावे, असे काही महिलांना वाटले आणि त्यातून उदयास आला ‘संवादिनी’ गट. हा गट नुसताच उदयाला आला असे नाही तर ‘स्वयंविकासातून समाज परिवर्तन’ हे ध्येय मनाशी धरून त्यांनी सुरू केलेल्या या गटाला दोन तपांच्या कार्याचे सोनेरी कोंदण लाभले. यासाठी अर्थातच ‘अनंत आमुची ध्येयासक्ती’ या ब्रीदाचा त्यांनी सन्मान केला आणि त्यासाठी सुयोग्य प्रयत्नदेखील केले. अनेक महिलांना समविचारी मैत्रिंणींसोबत काही काम करावे असे वाटले आणि त्यांनी स्वत:ला या ‘संवादिनी’च्या कार्यात सामावून घेतले. यामुळे एक खूप महत्त्वाची गोष्ट झाली आणि ती म्हणजे त्यांच्या स्वतःच्या क्षमतांची ओळख होण्याबरोबरच स्वत:ची ओळख झाल्यामुळे त्यांची स्वप्रतिमा उजळून निघाली.

उद्याच्या पिढीच्या सक्षमीकरणात महत्त्वाचा वाटा उचलणारा हा गट पंचविसाव्या वर्षात पदार्पण करत आहे ही विशेष बाब आहे. ‘वेळ नाही’ ही सबब बाजूला ठेवत उपलब्ध वेळ सत्कारणी लावत सुरू असलेल्या त्यांच्या या कार्यामुळे स्वविकासाबरोबरच समाज विकासातही त्या महत्त्वाचे योगदान देत आहेत. संवादिनीची उद्दिष्टे म्हणजे महिलांमधील आत्मभान (स्व जाणीव) आणि आत्मसन्मानाची (स्व आदर) भावना बळकट करण्यासाठी संवादिनीचे हे व्यासपीठ वापरले जाते. त्याबरोबर त्यांच्या संघटन कौशल्याचाही उपयोग या माध्यमातून आपोआपच होतो. या गटाच्या संपर्कात येणाऱ्या महिलांचे संघटन करणे, समाजातील कुटुंब जीवनाच्या गुणवत्तेचा अभ्यास करून ती वाढविण्यासाठी प्रयत्न करणे, विविध वयोगटांतील स्वयंसेवी वृत्तीच्या व्यक्तींची ‘कार्यकर्ता घडण ते नेतृत्व घडण’ ही प्रक्रिया अधिक समृद्ध करणे, महिलांच्या ‘मानसिक आरोग्य संवर्धनासाठी’ प्रयत्नशील राहणे, प्रबोधनात्मक तसेच कौशल्य विकासाच्या उपक्रमांची मांडणी आणि उपाययोजन करणे आदी उद्दिष्टांच्या सहाय्याने या गटाचे कार्य चालते.

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Amit Thackeray on Eknath Shinde
Amit Thackeray : “धनुष्यबाण आणि पक्षनाव घेऊन एकनाथ शिंदेंनी चूक केली”, शिवसेनेतील बंडखोरीवरील अमित ठाकरेंची प्रतिक्रिया चर्चेत!
china super rich numbers declining
‘या’ देशातील श्रीमंत लोक देश सोडून का जात आहेत? श्रीमंतांच्या संपत्तीत घट होण्याचे कारण काय?
Manoj Jarange Patil maulana sajjad nomani
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे आता दिल्ली हादरवणार? मुस्लीम, बौद्ध धर्मगुरुंची साथ? रणनिती तयार, हिंदीचा अडथळाही दूर
retired army soldier firing
पार्किंगच्या वादातून निवृत्त लष्करी जवानाकडून एकावर गोळीबार; टेम्पो चालकाचा मृत्यू, येरवड्यातील घटना
Karuna Sharma Cried
Karuna Sharma : उमेदवारी अर्ज बाद ठरल्याने ढसाढसा रडल्या करुणा शर्मा, धनंजय मुंडेंना म्हणाल्या, “तू राक्षस…”

हेही वाचा – अंकुश चिंतामण, हेमंत पाटील यांना, केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक

सामाजिक हितासाठी स्वतःचा वेळ देऊ इच्छिणाऱ्या स्त्रियांचे एकत्रीकरण (गट बांधणी) हा हेतू मनात ठेवून संवादिनीची सुरुवात २००० साली करण्यात आली. या संवादिनीच्या माध्यमातून विविध उपक्रम चालतात. त्या उपक्रमांमध्ये ‘उमलत्या वयाशी जुळवून घेताना’ या उपक्रमांतर्गत वयात येणाऱ्या मुला-मुलींसाठी लैंगिकता प्रशिक्षण, ‘बहर जोपासताना’ या उपक्रमाद्वारे पालकांसाठी कार्यशाळा, ‘तरुणाईची आव्हाने’ या उपक्रमाद्वारे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘जीवन कौशल्य’ कार्यशाळा, तर सहजीवनाच्या उंबरठ्यावर उपक्रमाअंतर्गत तरुणांसाठी ‘विवाहपूर्व मार्गदर्शन’ही करण्यात येते. इयत्ता पहिली ते सातवीच्या वयोगटासाठी लैंगिक शोषण विरोधी जाणीव जागृती कार्यशाळा म्हणजे ‘ओळख स्पर्शाची’ या उपक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकसनाला चालना देणारा ‘विद्याव्रत संस्कार’ देखील या गटामार्फत केला जातो.

हेही वाचा – पार्किंगच्या वादातून निवृत्त लष्करी जवानाकडून एकावर गोळीबार; टेम्पो चालकाचा मृत्यू, येरवड्यातील घटना

या शिवाय वंचित गटातील मुलांना शिक्षणपूरक कृतीतून मार्गदर्शन करणारा ‘पालवी’ उपक्रम, दहा ते तेरा या वयोगटातील मुलामुलींसाठी ‘स्व-भान व सामाजिक भान’ मार्गदर्शन कार्यशाळा, बारा ते सोळा वयोगटातील विद्यार्थ्यांना जीवन कौशल्य मार्गदर्शन करणारा कौशल्य गट, समृद्धी आणि समानतेने युक्त अशा संतुलित समाजासाठी चिंतनशील आणि वैचारिक लेखन असणारे ‘समतोल’ हे द्वैमासिक असे विविध उपक्रम या गटामार्फत सातत्याने सुरू आहेत. ‘संवादिनी’चे उपक्रम पुण्यातील सदाशिव पेठेतील ज्ञान प्रबोधिनी शाळा, पौड रस्ता, औंध, शिरूर, राजगुरुनगर, बोरिवली, सोलापूर, ठाणे, डोंबिवली, भाईंदर आदी ठिकाणीही चालतात. या उपक्रमात सहभागी असणाऱ्या सदस्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी समूहगुण कार्यदिशेच्या मदतीने प्रशिक्षणाचेदेखील आयोजन केले जाते. या गटामार्फत २०२२-२३ मध्ये ‘जेंडर सेन्सिटायझेनशन’ या विषयावर पोलिसांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली होती. विविध वयोगटातील आणि विविध आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक स्तरांवरून एकत्र आलेल्या या भगिनींचे कार्य पाहिले की स्त्रीशक्ती काय असते याची जाणीव सहजतेने होऊ शकते. सामाजिक भान जागृत ठेवत एकत्र आलेल्या सगळ्या जणींचे कार्य म्हणजे उद्याची पिढी सक्षम व्हावी म्हणून कार्यरत असणारे शिक्षक, प्राध्यापक आणि मुख्यतः पालक या सर्वांना सहाय्यकारी असे संवादाचे एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

Story img Loader