पुणे : नाशिक पदवीधर निवडणुकीदरम्यान सत्यजित तांबे यांनी बंडखोरी केल्यानंतर, काँग्रेस पक्षाने सत्यजीत तांबे यांच्यावर कारवाई केली होती. तरीदेखील पदवीधर मतदारसंघातून प्रचंड मतांनी सत्यजीत तांबे हे निवडून आले होते. या निवडणुकीला जवळपास सहा महिन्यांचा कालावधी होऊन गेला. त्यादरम्यान राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या, पण सत्यजित तांबे नेमके कोणत्या पक्षात जाणार हे अद्यापही निश्चित झाले नाही. या राजकीय घडामोडीदरम्यान सत्यजीत तांबे पुणे दौर्‍यावर आले होते. त्यावेळी त्यांनी काँग्रेस प्रवेशावर भाष्य केले आहे.

हेही वाचा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या महापालिकेतील आढावा बैठकीकडे शिवसेना खासदार, भाजपा आमदारांची पाठ

Bhandara, Congress-Pawar group Bhandara,
भंडारा : चरण वाघमारेंच्या ‘एन्ट्री’मुळे काँग्रेस-पवार गटाचे नेते आक्रमक; सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
Baba Siddique with Salman Khan and Shahrukh Khan iftar party
Baba Siddiqui Murder: सामान्य कार्यकर्ता ते मंत्री, बॉलीवूडमध्येही चलती; बाबा सिद्दीकींचा राजकीय प्रवास कसा होता?
Like British Congress only thoughts of looting country modi criticism in phohadevi washim
काँग्रेस इंग्रजांप्रमाणेच देशाला लुटण्याचा विचार करते….बंजारा समाजाविषयी सदैव अपमानजक….पोहरादेवीत पंतप्रधानांचा घणाघात….
readers comments on Loksatta editorial
लोकमानस : सरकारला सर्वच आंदोलनांची भीती वाटते
Congress Leader Statement on Veer Savarkar
Veer Savarkar : “वीर सावरकर ब्राह्मण होते तरीही गोमांस खायचे, त्यांनी..” काँग्रेस नेत्याच्या वक्तव्यामुळे नवा वाद
sharad pawar marathi news
‘कोरेगाव भीमा’प्रकरणी गोष्टी वदविण्याचा प्रयत्न, कोणत्या राजकीय नेत्याने केला हा आरोप !
Amit Shah Nagpur, BJP, Congress, Vidarbha,
महाशक्तीला विदर्भात काँग्रेसची भीती का वाटते ?

हेही वाचा – अजित पवारांचे स्वागत करतांना ध्वनी प्रदूषणाचे नियम धाब्यावर; बुलेट चालक सुस्साट

काँग्रेस पक्षात जाणार का असे विचारले असता तांबे म्हणाले की, काँग्रेसमधील काही ठराविक लोकांनी मला लक्ष्य करून बाहेर काढले. आमच्या रक्तात आणि विचारात काँग्रेस आहे. मला पक्षातून काही लोकांनी बाहेर ढकलून दिले असले तरी आता पक्षश्रेष्ठींची जबाबदारी आहे की, मला त्यांनी परत बोलावलं पाहिजे. पण अद्यापपर्यंत अशी कुठलीही हालचाल झालेली नाही. निवडणुकीच्या काळात जो काही एपिसोड झाला तो आपल्या सगळ्यांच्या समोर आहे, कशा पद्धतीने माझ्याबरोबर राजकारण झाले आणि कशा पद्धतीने पक्षातून बाहेर ढकलण्यात आले, मी काही एकटाच नाही, तर देशात माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते आहेत. त्यांना नेत्याकडून ठरविक ठिकाणी टार्गेट करून ढकलण्यात येत आहे. ही चिंतेची बाब असून यावर काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी विचार करणे गरजेचे असल्याची भूमिका मांडत सत्यजीत तांबे यांनी काँग्रेस पक्षात परतण्याचे संकेत दिले आहेत.