काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी स्वा.सावरकर यांच्याबद्दल भारत जोडो यात्रेत वादग्रस्त विधान केल्याने राज्यातील भाजपासह हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर आज पुण्यातील सारसबाग येथील सावरकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यावर हिंदू महासंघाचे आनंद दवे आणि स्वा.सावरकर यांच्या कुटुंबातील सदस्य सात्यकी सावरकर यांनी स्वा. सावरकर यांच्या पुतळ्यावर गुलाब जलाने अभिषेक केला. यावेळी सामुदायिक सावरकर गीत देखील पठण केले.

हेही वाचा- राहुल गांधींकडून समाजात फूट पाडण्याचे काम; रामदास आठवले यांची टीका

pune, Savarkar, Patiala court, Rahul Gandhi
पुणे : राहुल गांधी यांच्या हजेरीसाठी पतियाळा न्यायालयामार्फत समन्स, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
sakshi malik on brij bhushan singh
Sakshi Malik: ‘भाजपा नेत्या बबिता फोगट यांनीच रचलं कुस्तीपटूंच्या आंदोलनाचं षडयंत्र’, साक्षी मलिकचा धक्कादायक दावा
Notice to Karnataka Health Minister in case of derogatory remarks about Swatantra Veer Savarkar Pune news
स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी अवमानकारक वक्तव्य प्रकरणी कर्नाटकच्या आरोग्यमंत्र्यांना नोटीस; सात्यकी सावरकर यांच्याकडून माफी मागण्याची मागणी
What Uddhav Thackeray Said?
Uddhav Thackeray : “डॉक्टरांनी आराम करायचा सल्ला दिला, पण मी त्यांना म्हटलं आधी…”, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य चर्चेत
kiren rijiju controversial remarks on rahul gandhi
राहुल गांधींसारखे विरोधी पक्षनेते देशाला शाप! संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांची टीका
Rahul Gandhi on Vinayak Damodar Savarkar
Rahul Gandhi: वीर सावरकरांच्या बदनामी प्रकरणी राहुल गांधींना पुणे न्यायालयाचे समन्स; ‘या’ तारखेला हजर राहण्याचे आदेश
Congress Leader Statement on Veer Savarkar
Veer Savarkar : “वीर सावरकर ब्राह्मण होते तरीही गोमांस खायचे, त्यांनी..” काँग्रेस नेत्याच्या वक्तव्यामुळे नवा वाद

यावेळी सात्यकी सावरकर म्हणाले की, राहुल गांधी यांची भारत जोडो देशातील अनेक भागातून गेली आहे. मात्र त्यावेळी राहुल गांधी यांनी स्वा. सावरकर यांच्याबद्दल कोणत्याही प्रकारे विधान केले नाही. पण महाराष्ट्रामध्येच आल्यावर त्यांनी सावरकर यांच्याबदल केलेल विधान हे जाणीवपूर्वक केल्याच स्पष्टपणे दिसत आहे. तसेच राहुल गांधी यांनी पहिल्यांदा सावरकर यांच्याबद्दल विधान केले होते. त्यावेळी रणजित सावरकर यांनी कोर्टात याचिका दाखल केली आहे. या गोष्टीला थोडा वेळ लागतो. मात्र जे खरं आहे. त्याचाच विजय होतो. वेळ लागू द्या, पण आज जे झाकोळून ठेवल आहे. ते पण राहु द्या, पण ते कधी तरी बाहेर पडणार असून शेवटी सावरकरांचाच विजय होणार असल्याचे सात्यकी म्हणाले.

हेही वाचा- राहुल गांधी यांच्या निषेधार्थ मनसेकडून मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग रोखण्याचा प्रयत्न

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या नेत्यांनी देखील सावरकर यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले आहे. हे विरोधक असूनदेखील सावरकर यांना मानसन्मान देत असतील आणि आता राहुल गांधी सारखे तोडळ पुढारी सावरकर यांच्यावर चिखल फेक करीत असतील. हे त्यांच्या नेत्यांना पटणार नसल्याचेही सात्यकी सावरकर म्हणाले.

हेही वाचा- पुणे: वैद्यकीय महाविद्यालय उभारणीची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात

स्वा.सावकार यांना भारतरत्न मिळवा, अशी मागणी शिवसेनेकडून सातत्याने करण्यात आली आहे. मात्र, राज्यातील मागील सरकारमधील महाविकास आघाडीमधील ठाकरे गट राहुल गांधी यांच्या विधानामुळे दुखावला गेला आहे. तसेच राहुल गांधी यांच्या विधानामुळे अनेक जण दुखावले गेले असून आता काँग्रेसची याच विधानामुळे राजकीय हानी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.