राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पाश्र्वभूमीवर ‘संवाद’तर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘पाणी वाचवा’ अभियानाचा प्रारंभ जागतिक रंगभूमिदिनाचे औचित्य साधून बुधवारी करण्यात आला.
अभिनेत्री सुरेखा कुडची यांच्यासह दीप्ती आहेर, माया खुटेगावकर, अर्चना जावळे, संगीता लाखे यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिर येथे नटराज पूजन करून या अभियानाची सुरुवात झाली. सुनील महाजन, बालगंधर्व रंगमंदिराचे व्यवस्थापक भारत कुमावत, एकपात्री कलाकार संघटनेचे अध्यक्ष संतोष चोरडिया, बंडा जोशी, वंदन नगरकर, उज्ज्वला कुलकर्णी, प्रवीण बर्वे, शशिकांत कोठावळे, रवि काळेले याप्रसंगी उपस्थित होते.
सुरेखा कुडची म्हणाल्या, राज्यातील दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर अपव्यय टाळून पाणी वाचविणे गरजेचे असून, त्यामध्ये आम्ही कलावंतांनी सहभाग दिला पाहिजे हाच हेतू आहे.