पुणे : राजस्थानातील पंतप्रधानांचे भाषण देशाच्या ऐक्याच्या विरोधात आहे. पंतप्रधान असे कसे बोलू शकतात, असा प्रश्न मला पडला. त्यांचा विरोध केला पाहिजे, अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली. तसेच गेल्या १० वर्षांत मोदी सरकारच्या काळात शेतीसंबंधीचे प्रश्न वाढले आहेत. सन २०१४पासून अमित शहा यांच्या पक्षाकडे सत्ता आहे. केवळ माझ्यावर टीका करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी, त्यांच्या हितासाठी काय केले ते सांगावे. परंतु अमित शहा यांचे शेतीसंबंधीचे ज्ञान मर्यादित आहे, त्यावर जास्त काय बोलायचे, असा टोलाही पवार यांनी हाणला.

हेही वाचा >>> उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शक्तिप्रदर्शन; पुण्यात वाहतूककोंडी

Why will families migrate from tiger protected areas
वाघांच्या संरक्षित क्षेत्रांतील कुटुंबांचे स्थलांतरण का होणार? समस्या काय? आव्हाने कोणती?
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
private guards stopped tourists for taking rare bird photo at wetland near palm beach road
पाणथळ जागेवर छायाचित्रणास मज्जाव! नवी मुंबईत विकासकाच्या सुरक्षारक्षकांकडून पर्यावरणप्रेमींची अडवणूक
friendship, unspoken bond, lifelong connection, love and labels, emotional journey, mutual respect, supportive relationship, life decisions
माझी मैत्रीण : ‘रिश्तों का इल्जाम ना दो’
rbi governor shaktikant das
कर्ज-ठेवीतील वाढत्या दरीवर लक्ष ठेवावे! रिझर्व्ह बँक गव्हर्नरांचे बँकांना आवाहन
ajit pwar and shard pawar
‘अजित पवारांच्या मनात नक्की काय माहिती नाही’; बारामतीमधून न लढण्याच्या अजित पवार यांच्या विधानावर शरद पवार यांची प्रतिक्रिया
Ladki Bahin Yojana Aditi Tatkare
“…तर १५०० परत घेऊ”, रवी राणांच्या विधानावर आदिती तटकरेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “महायुतीच्या सरकारने…”
Jitendra awhad marathi news
कळवा, मुंब्रा, दिव्यात एकाच कामावर दोनदा खर्च?; राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे शपथपत्र प्रसिद्ध करण्यात आले. त्या वेळी पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या वेळी उपस्थित होते. नुकत्याच झालेल्या प्रचारसभेत अमित शहा यांनी पवार यांच्यावर शेती, शेतकरी यांच्यासंदर्भात टीका केली होती. मी कृषिमंत्री असताना तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग अमरावतीत आले होते. त्यांना तेथील शेतकऱ्यांचे प्रश्न, अडचणी प्रत्यक्षात दाखवून देण्यात आल्या. त्यानंतर कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला. गेल्या १० वर्षांत अमरावती, यवतमाळ आणि इतर जिल्ह्यांतील शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. काँग्रेसच्या काळापेक्षा आता दीडपट अधिक शेतकरी आत्महत्या होत आहेत. परंतु अमित शहा त्यावर काही बोलत नाहीत. वीस वर्षांआधी काय झाले, चाळीस वर्षांआधी काय झाले हे विचारण्यापेक्षा गेल्या १० वर्षांत मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काय केले ते सांगावे, असेही पवार म्हणाले. निवडणुकीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. आता दुसऱ्या टप्प्याचे मतदान होणार आहे. याबाबत विचारले असता पवार म्हणाले, की पहिल्या टप्प्यात जनमत भाजपविरोधात गेले आहे. त्यामुळे भाजप अस्वस्थ आहे. म्हणून जात-धर्म, हिंदू-मुस्लिम मुद्दे घेतले जात आहेत.