मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी पुण्यात राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या कामावर बोलताना जोरदार टोलेबाजी केली. “माझ्या नवऱ्याच्या हातात सत्ता येईल तेव्हाच महाराष्ट्रातील रस्ते चांगले होतील,” असं मत शर्मिला ठाकरे यांनी व्यक्त केलं. यावेळी त्यांनी राज्य सरकारकडून अद्याप काहीच चांगलं काम घडलेलं नाही, असं म्हणत शिंदे-फडणवीस सरकारला टोलाही लगावला. त्या पुण्यात पत्रकारांशी बोलत होत्या.

शर्मिला ठाकरे म्हणाल्या, “किमान रस्ते तरी नीट करा. स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षे झालीत, आता आपण ७५ वर्षे साजरी करत आहोत. महाराष्ट्र राज्य देशाला ४० ते ५० टक्के कर देतो. महाराष्ट्र केंद्राला करातून सर्वाधिक पैसे देतो, मग तुम्ही तुमचं राज्य तर नीट करा.”

BJP MNS Thackeray groups are aggressive after getting bail for the accused who molested a minor girl thane news
अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरण: आरोपीला जामीन मिळाल्याने भाजप, मनसे, ठाकरे गट आक्रमक
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
baba siddiqui cremated with state honors
Baba Siddiqui Murder : बाबा सिद्दीकींच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, बॉलिवूड कलाकारांसह राजकारण्यांनी दिला अखेरचा निरोप!
Bhanudas Murkute arrested, Ahmednagar,
अहमदनगर : माजी आमदार भानुदास मुरकुटे यांना अटक
uddhav thackeray criticized mahayuti government
न्यायदेवतेवर विश्वास पण दोन वर्षे न्याय मिळाला नाही! उद्धव ठाकरे यांची खंत
Imtiaz Jaleel, case against Imtiaz Jaleel, Pune,
माजी खासदार इम्तियाज जलील यांच्याविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल
Shambhuraj Desai, Uddhav Thackeray,
चुकीच्या लोकांच्या संगतीमुळे उद्धव ठाकरे दबावाखाली, मंत्री शंभूराज देसाई यांचा टोला
police registered case for threat call of planted bomb in haji ali dargah office
हाजी अली दर्ग्यात बॉम्ब ठेवल्याची धमकी देणाऱ्याविरोधात गुन्हा

“माझ्या नवऱ्याच्या हातात सत्ता येईल तेव्हाच महाराष्ट्रातील रस्ते चांगले होतील”

“आपले रस्ते चांगले होतील अशी आपण इच्छ व्यक्त करुयात. काम करण्याची मानसिकता हवी. माझ्या नवऱ्याच्या हातात सत्ता येईल तेव्हाच महाराष्ट्रातील रस्ते चांगले होतील, असं मला वाटतं,” असं मत शर्मिला ठाकरे यांनी व्यक्त केलं.

“अजून तरी काही चांगलं झालेलं नाही, पण…”

“आपण कायम आपल्या आयुष्यात काही तरी चांगलं झालं पाहिजे असे चांगले विचार करावेत. अजून तरी काही चांगलं झालेलं नाही, पण आता होईल,” असं म्हणत त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला टोलाही लगावला.

“मी गडकरींना रात्री १२ वाजता फोन केला होता”

शर्मिला ठाकरे मुंबई-गोवा महामार्गाच्या स्थितीवर बोलताना म्हणाल्या, “नितीन गडकरी घरी आले होते. तेव्हा त्यांनी सांगितलं की वहिनी आजच तुमचं नाव भाषणात घेतलं. मी त्यांना रात्री १२ वाजता फोन करून मुंबई-गोवा रस्त्याकडे बघा, किती खड्डे आहेत, असं सांगितलं होतं. यानंतर नितीन गडकरी यांनी भाषणात माझा उल्लेख केला,” असं शर्मिला ठाकरे यांनी सांगितलं.

हेही वाचा : सरकारला पाठिंबा दिला याचा अर्थ असा नाही आम्ही सर्वच खपवून घेऊ – राजू पाटील

“आपल्याकडेच राजकारणी मुद्दाम चांगले रस्ते का करत नाहीत?”

“माझं म्हणणं असं आहे महाराष्ट्र मागासलेलं राज्य नाही. महाराष्ट्र राज्याची सीमा कोणत्याही बाजूने सोडली तर गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, हैदराबाद या सगळ्या ठिकाणी गुळगुळीत रस्ते दिसतात. आपल्याकडेच राजकारणी मुद्दाम चांगले रस्ते का करत नाहीत?” असा सवालही शर्मिला ठाकरेंनी केला.